शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
4
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
5
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
6
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
7
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
8
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
9
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
10
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
11
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
12
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
13
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
14
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
15
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
16
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
17
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
18
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
19
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
20
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

जखमेला मुंग्या... वेदनेने विव्हळत त्याने घाटी रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडला श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 11:53 AM

अपघात विभागाच्या पायऱ्यांवरच जखमीचा अनेक तास पडून असताना मृत्यू

ठळक मुद्देजिवंतपणी कोणी पाहिले नाही; पण मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणेची धावपळमाहिती दिल्यानंतरही उपचारासाठी दोन तास कोणीच आले नाही

औरंगाबाद : पायाला जखम झालेली आणि त्या जखमेला मुंग्या लागलेल्या, माश्या घोंगावत होत्या, अशा अवस्थेत एक व्यक्ती घाटीतील अपघात विभागाच्या पायऱ्यांवर वेदनेने विव्हळत पडून होता, येणारे-जाणारे पाहून पुढे जात होते. पण काहींनी अपघात विभागातील डाॅक्टरांना माहिती दिली. मात्र, वेळीच कोणीही त्यांच्याकडे धावले नाही. शेवटी पडल्या जागेवरच त्याने अखेरचा श्वास घेतला. मृत्यू झाल्यानंतर त्याला अपघात विभागात दाखल करण्यासाठी यंत्रणेने धावपळ केली.

घाटीतील अपघात विभागासमोर पडून असलेल्या या व्यक्तीविषयी के.के. ग्रुपचे उपाध्यक्ष किशोर वाघमारे, अक्षय दांडगे यांनी डाॅक्टरांना माहिती दिली. परंतु त्यानंतरही कोणीही वेळीच दखल घेतली नाही, अशी ओरड होत आहे. सदर व्यक्तीला कोणीतरी घाटीत सोडून गेल्याची शक्यता घाटी प्रशासनाने व्यक्त केली. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे म्हणाले, या व्यक्तीला ज्यांनीही घाटीत सोडले, त्यांनी अपघात विभागात दाखल करणे गरजेचे होते. या व्यक्तीला कर्मचाऱ्यांनी अपघात विभागात दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी तपासून मयत घोषित केले. त्याची ओळखी पटलेली नाही.

..तर वाचले असते प्राणएका कोरोना रुग्णाला दाखल करताना अपघात विभागासमोर सदर व्यक्ती पडून असल्याचे दिसले. त्याच्या पायाला झालेल्या जखमेला मुंग्या झाल्या होत्या. तोपर्यंत तो जिवंत होता. त्याविषयी अपघात विभागातील डाॅक्टरांना माहिती दिली. तसेच ‘आरएमओ’ यांनाही माहिती दिली. पण दोन तासांनंतरही कोणीही आले नाही. शेवटी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. वेळीच त्याच्यावर उपचार केले असते तर प्राण वाचले असते, असे के.के. ग्रुपचे उपाध्यक्ष किशोर वाघमारे म्हणाले.

टॅग्स :Deathमृत्यूgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबाद