शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

व्वा..! छत्रपती संभाजीनगरहून सकाळी मुंबईसाठी आणखी मोठे विमान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 4:02 PM

उडान योजनेसाठी, जयपूर, उदयपूर विमानसेवेसाठी केंद्रीय मंत्र्यांकडे साकडे

छत्रपती संभाजीनगर : एअर इंडियाने सकाळच्या वेळेतील मुंबई- छत्रपती संभाजीनगर- मुंबई विमान एअरबस ए-३१९ वरून एअर-३२० मध्ये बदलले आहे. हे विमान १८६ आसनी आहे, अशी माहिती टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या (एटीडीएफ) सिव्हिल एव्हिशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी दिली.

नव्या विमानामुळे सकाळच्या वेळी मुंबईला जाण्यासाठी ६० प्रवाशांची वाढीव आसने उपलब्ध झाली आहेत. आधीचे विमान १२६ आसनी होते. एअर इंडिया व्यवस्थापनाने प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण केल्याचे सुनीत कोठारी यांनी सांगितले. याबरोबर छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उडान योजनेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. उडान योजनेत समावेश झाल्यास जयपूर- उदयपूर- छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर- वाराणसी- छत्रपती संभाजीनगर विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘पोर्ट ऑफ कॉल’ म्हणून हवा समावेशचिकलठाणा विमानतळाचा ‘पोर्ट ऑफ काॅल’ म्हणून समावेश करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय चार्टर विमानसेवेसह नियमित आंतरराष्ट्रीय सेवेसाठी ही बाब आवश्यक आहे, असे टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे जसवंत सिंग यांनी सांगितले. यातून दुबई, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम आदी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्यास मदत होईल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानtourismपर्यटन