शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनो, नोकरी मागणारे नव्हे, देणारे व्हा; नितीन गडकरी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

By राम शिनगारे | Updated: October 13, 2023 19:28 IST

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत सोहळा

छत्रपती संभाजीनगर : एमजीएम विद्यापीठाने युवकांना वेगवेगळ्या विषयातील पदवी प्रदान केली. पदवी घेणाऱ्या युवकांना ज्ञान, तंत्रज्ञानाचा आधार घेत नोकरी मागणारे नाही तर देणारे झाले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत सोहळा रुक्मिणी सभागृहात शुक्रवारी आयोजित केला होता. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दीक्षांत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ.पी.एम. जाधव, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन कदम, डॉ. सुधीर कदम, भाऊसाहेब राजळे, परीक्षा नियंत्रक डॉ. हरिरंग शिंदे, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, डॉ. प्राप्ती देशमुख, डॉ.जॉन चेल्लादुराई, प्रा. पार्वती दत्ता, डॉ. विजया मुसांडे, डॉ. परमिंदर कौर यांची उपस्थिती होती. 

यावेळी गडकरी म्हणाले, महात्मा गांधी यांनी खेड्यांच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या विचारावरच खेड्यांचा विकास झाला पाहिजे. पुन्हा एकद शहरातून लोक गावाकडे गेले पाहिजेत. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा गावात रस्ते, वीज, पाणी, शाळा, आरोग्य, मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध होतील. हे करण्यासाठी शेतकरी निव्वळ अन्नदाता राहून चालणार नाही. त्यास उर्जादाता, पेट्रोलदाता बनावे लागेल, असेही गडकरी यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोप कुलपती अंकुशराव कदम यांनी केला. सुरुवातीला विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी मांडला. प्रत्येक विद्याशाखेच्या अधिष्ठातांनी पदवीप्रदान केल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची घोषणा केली. यावेळी दहा विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मानित केले. संचालन कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी केले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAurangabadऔरंगाबादmgm campusएमजीएम परिसर