शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

डिनरनंतर कुटुंब झोपी गेले अन् सकाळी इंजिनिअरच्या घरी चौघांचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 13:36 IST

रविवारी चेतन कुटुंबासह त्यांच्या मूळ गावातील मंदिरात दर्शनासाठी गेला होता. त्यानंतर कुटुंबाने सासरी जात जेवण केले आणि त्यानंतर घरी परतले होते.

बंगळुरू - कर्नाटकच्या म्हैसूर इथं सोमवारी सकाळी २ वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृतदेह आढळला आहे. दक्षिण म्हेसूर येथे संकल्प सेरेन अपार्टमेंट्समध्ये जॉब कंसल्टेंसी फर्म चालणारे इंजिनिअर, त्यांची पत्नी, मुलगा आणि आई यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आले. प्राथमिक तपासात आर्थिक संकटात सापडलेल्या इंजिनिअरने आई, पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. इंजिनिअरची आई अपार्टमेंटमधील दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहत होती.

सोमवारी पोलिसांना संकल्प सेरेन अपार्टमेंटमध्ये एकाच कुटुंबातील ४ लोकांच्या मृत्यूची बातमी कळली. त्यानंतर तातडीने पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. या मृतांमध्ये चेतन, त्याची पत्नी रुपाली, १५ वर्षीय मुलगा कुशल आणि चेतनची आई प्रियंवदा यांचा समावेश आहे.चेतनचा मृतदेह त्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला तर पत्नी आणि मुलाचा मृतदेह जमिनीवर पडला होता.  चेतनची आई प्रियंवदाचा मृतदेह त्याच कॉम्प्लेसमधील दुसऱ्या फ्लॅटमध्ये आढळला. चौघांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. चेतनने मृत्यूपूर्वी व्हॉईस कॉल केला होता ज्यात आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होते.

दुबईत असलेला इंजिनिअर नुकताच कर्नाटकात आला

पोलिसांच्या माहितीनुसार, चेतन आणि त्याच्या कुटुंबाच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट नाही. आर्थिक तंगीमुळे हे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. चेतनवर खूप कर्ज होते. दुबईत इंजिनिअर म्हणून काम केल्यानंतर २०१९ साली तो म्हैसूरला परतला होता. तिथे त्याने जॉब कंसल्टेंसी सुरू केली. तो दुबईतील कंपन्यांमध्ये पदवीधरांना नोकरी देण्यासाठी मदत करायचा. रविवारी चेतन कुटुंबासह त्यांच्या मूळ गावातील मंदिरात दर्शनासाठी गेला होता. त्यानंतर कुटुंबाने सासरी जात जेवण केले आणि त्यानंतर घरी परतले होते.

दरम्यान, चेतनने पत्नी, मुलगा आणि आईला विष प्यायला दिले त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी सध्या सर्व मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवले आहेत. फॉरेन्सिक आणि पोस्टमोर्टम रिपोर्टची प्रतिक्षा केली जात आहे. घटनेपूर्वी चेतनने त्याच्या मेव्हण्याला फोन केला होता जो अमेरिकेत राहतो. त्यानंतर ही बातमी पोलिसांकडे पोहचली. गेल्या एक दशकापासून चेतन आणि त्याचे कुटुंब अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांचे कुटुंब लोकांमध्ये मिसळायचे परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव कधी दिसला नाही असं शेजाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Karnatakकर्नाटक