शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

कर्जाच्या ओझ्याखाली घुसमटणाऱ्या कुटुंबानं घेतला टोकाचा निर्णय; ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 12:22 PM

केदार लाल गुप्ता शहरातील विजय बाजारात फळांचे दुकान चालवतात. त्यांच्यावर खूप कर्ज होतं.

नवादा - बिहारमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका कुटुंबाने मृत्यूला कवटाळलं आहे. नवादा परिसरातील न्यू एरिया येथील केदार लाल गुप्ता यांनी बुधवारी रात्री पत्नी आणि ४ मुलांसह विष पिऊन आत्महत्या केली आहे. कुटुंबातील ५ सदस्यांच्या आकस्मित मृत्यूनं परिसरात खळबळ माजली आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 

मृतांमध्ये घरातील प्रमुख केदार लाल गुप्ता, पत्नी अनिता कुमारी, ३ मुले प्रिन्स कुमार, शबनम कुमारी, गुडिया कुमारी यांचा समावेश आहे तर १ मुलगी साक्षी तिची अवस्था बिकट आहे. तिच्यावर नवादा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याठिकाणाहून तिला पटणा येथे नेण्यात आले आहे. केदार लाल गुप्ता शहरातील विजय बाजारात फळांचे दुकान चालवतात. त्यांच्यावर खूप कर्ज होतं. त्यामुळे कर्ज देणाऱ्यांनी त्यांच्यावर पैशांसाठी दबाव टाकला होता. वारंवार होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून केदार गुप्ता आणि कुटुंबाने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. 

घरातील सगळ्यांनीच विष पिऊन आत्महत्या केली. त्यात एका मुलीचा जीव सुदैवाने वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. तेव्हा केदार गुप्ता हे जिवंत होते. पोलिसांनी त्यांना विचारले असता. ते म्हणाले की, माझ्या कुटुंबावर १०-१२ लाखांचे कर्ज आहे. या कर्जाच्या ओझ्याखाली आम्हाला जगणं कठीण झाले आहे. त्यामुळे सर्वांनी आनंदाने विष प्यायलं असं म्हटलं. केदार गुप्ता यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 

विष पिण्याआधी मुलानं बनवला व्हिडिओविष पिण्याआधी केदार गुप्ताचा मुलगा प्रिन्सनं एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओत त्याने सांगितले की, बाजारात काही लोकांकडून कर्ज घेतले होते. ते पैशासाठी आम्हाला सतवत आहेत. आम्ही पैसे परत देण्यासाठी थोडा वेळ मागितला परंतु ते ऐकण्यास तयार नव्हते. वारंवार धमकावत होते. ज्यामुळे सर्वांनी विष पिण्याचा निर्णय घेतला. तर या दुर्घटनेत वाचलेल्या साक्षीने म्हटलं की, कर्जामुळे वडिलांवर मानसिक तणाव आला होता. त्यामुळे आम्ही दडपणाखाली जीवन जगत होतो. त्यातून सुटका होण्यासाठी हा टोकाचा निर्णय घेतला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"