शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

सावधान! Unknown नंबरवरुन आला Miss Call अन् खात्यातून उडाले ५० लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 11:02 AM

दिल्लीत एक सिक्युरिटी एजन्सी चालवणारा व्यक्ती सायबर फ्रॉडचा शिकार झाला आहे.

नवी दिल्ली-

दिल्लीत एक सिक्युरिटी एजन्सी चालवणारा व्यक्ती सायबर फ्रॉडचा शिकार झाला आहे. हॅकर्सनं त्याच्या बँक खात्यातून ५० लाख रुपये एका झटक्यात उडवले आहेत. पीडित व्यक्तीच्या दाव्यानुसार त्यानं आपला OTP नंबरही कुणाशी शेअर केला नव्हता. तरीही त्याच्या खात्यातून लाखो रुपये लंपास करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं गुन्ह्याची नोंद करुन चौकशीला सुरुवात केली आहे. 

पीडिताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार १३ नोव्हेंबर रोजी एका अनोळखी नंबरवरुन फोन आला. ते फोन उचलायचे पण समोरुन कुणीच बोलायचं नाही. त्यानंतर वारंवार त्याच नंबरवरुन मिस कॉल येऊ लागले. यात त्यांनी दोन-तीन वेळा फोन उचलला पण समोरुन कुणीच बोलत नव्हतं. जवळपास १ तास हे सुरूच होतं. काही वेळानंतर एक SMS आला आणि तो पाहून डोळेच फिरले. कारण त्यांच्या अकाऊंटमधून ५० लाख रुपये लाटण्यात आले होते. 

डीसीपी सायबर सेलच्या माहितीनुसार तक्रारदार व्यक्तीला OTP प्राप्त झाला होता. पण त्यांचा मोबाइल हॅक झालेला असल्यामुळे तो हॅकरकडून वापरला गेला आणि तक्रारदाराला ते कळलंच नाही. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हेगारांना पकडण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. 

नुकतंच दिल्लीच्या द्वारका परिसरात सायबर गुन्हेगारांनी एका प्राध्यपकाला लक्ष्य केलं होतं. त्यांच्या कॅनरा बँक अकाऊंटमधून ६,२५,०७४ रुपये लाटण्यात आले होते. त्यांनी तातडीनं एनसीआरपी हेल्पलाइन नंबरवर कॉल करुन याची तक्रार नोंदवली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी