शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

ऐरोली गोळीबार: पित्याला मुलांपेक्षा होती संपत्ती प्रिय; थकबाकी भरण्यास सांगितल्याने घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 09:17 IST

गोळीबारात बचावलेल्या सुजयने काही वर्षांपूर्वी वडिलांच्या बँक खात्यातून परस्पर ४ लाख रुपये काढले होते. याचा राग भगवान यांच्या मनात होता. सोमवारी विजयसोबत भांडण सुरू असताना सुजयदेखील तिथे उपस्थित होता. त्यामुळे सुजयवरदेखील जुना राग काढत गोळी झाडली.

- सूर्यकांत वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वतःच्या दोन मुलांवर गोळीबार करणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मुलांपेक्षा संपत्ती अधिक प्रिय होती. त्यांना महिन्याचे दीड लाखाहून अधिक उत्पन्न येत असतानाही कुटुंबाच्या गरजा भागवण्यात हात आखडता घेण्याची सवय होती. यातूनच स्वतः वापरत असलेल्या गाडीच्या दुरुस्ती व इन्शुरन्सचे पैसे थकीत ठेवले होते. याबाबत मुलाने ऐकवल्याच्या रागातून त्यांनी गोळी झाडल्याचे उघड झाले. 

निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील यांनी स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या झाडल्याची घटना सोमवारी संध्याकाळी ऐरोलीत घडली. यामध्ये दोन गोळ्या लागल्याने विजय याचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसरा मुलगा सुजय याची प्रकृती स्थिर आहे. भगवान हे ऐरोली सेक्टर ३ येथे पत्नी, मोठा अपंग मुलगा अजय, त्याची पत्नी व दोन मुले यांच्यासह राहायला आहेत. दहा वर्षांपूर्वी ते नवी मुंबई पोलीस दलाच्या सुरक्षा शाखेतून निवृत्त झाले असून त्यापूर्वी रबाळे, तुर्भे पोलीस ठाण्यात त्यांनी काम केलेले आहे. त्यांचा मधला मुलगा विजय हा वसईला व लहान मुलगा सुजय हा ऐरोलीतच काही अंतरावर राहायला आहे. 

भगवान यांनी स्वतः वापरत असलेल्या इनोव्हा कारच्या दुरुस्तीचे व इन्शुरन्सचे सुमारे १२ हजार रुपये थकवले होते. पोलिसाचा रुबाब झाडून बिलाचे पैसे थकीत ठेवण्याची त्यांना सवय असल्याची चर्चा परिसरात आहे. यामुळे त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीसाठी अनेक जण मुलांना फोन करायचे. अशाच प्रकारातून गाडीच्या विम्याच्या व दुरुस्तीच्या थकीत पैशासाठी संबंधिताने विजयला फोन केला होता. त्यावरून विजयने वडिलांना फोन करून थकीत पैसे भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्यांनी त्याला घरी बोलावले होते. त्यानुसार संध्याकाळी विजय हा वसईवरून ऐरोलीला आला असता झालेल्या भांडणातून भगवान यांनी विजयवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर घरातच उपस्थित असलेल्या सुजयवर देखील गोळी झाडली. परंतु ती गोळी सुजयच्या पोटाला घासून गेल्याने तो बचावला. 

घरखर्चात आखडता हात भगवान यांची खारघर, ऐरोली व इतर ठिकाणी घरे असून ती भाड्याने दिलेली आहे. यातून त्यांना महिना दीड लाखाहून अधिक उत्पन्न मिळते. परंतु घरखर्चासाठी पत्नीला केवळ महिना १५ ते १७ हजार रुपये दिले जायचे. त्यामुळे घरखर्च भागवण्यास त्यांची पत्नी व मोठी सून जेवणाचे डबे पुरविण्याचे काम करतात. 

सुजयवरही होता जुना राग गोळीबारात बचावलेल्या सुजयने काही वर्षांपूर्वी वडिलांच्या बँक खात्यातून परस्पर ४ लाख रुपये काढले होते. याचा राग भगवान यांच्या मनात होता. सोमवारी विजयसोबत भांडण सुरू असताना सुजयदेखील तिथे उपस्थित होता. त्यामुळे सुजयवरदेखील जुना राग काढत गोळी झाडली.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिस