शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 01:20 IST

रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास रायगड पोलीस त्यांना घेऊन गेले.

रायगड : वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबागच्या न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. गोस्वामी यांच्यासह अन्य आरोपी फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनाही तळोजा कारागृहात नेण्यात आले आहे.

रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास रायगड पोलीस त्यांना घेऊन गेले. ज्या वाहनातून गोस्वामी यांना पोलीस घेऊन गेले होते, ती गाडी पूर्णपणे सगळ्या बाजूने झाकण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर गोस्वामी आणि त्यांच्यासोबतच्या अन्य दोघांना अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले होते. ४ दिवस तेथे ठेवल्यानंतर गोस्वामी यांना आज तळोजा कारागृहात हलविण्यात आले.

अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण हाय प्रोफाइल प्रकरण आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तळोजा कारागृहात हलवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती कारागृह प्रशासनाने जिल्हा सत्र न्यायालयाला केली होती. कारागृह महानिरीक्षक यांच्याशी बोलून निर्णय घेण्याचे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार, निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीPoliceपोलिस