शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

१२० तारखा अन् शेवटची २४ पानी चिठ्ठी...! पतीने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:09 IST

बंगळुरूमध्ये काम करणाऱ्या अतुल सुभाषने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने एक तासाचा व्हिडिओ बनवला आहे. 

बंगळुरू - सध्या महिलांसाठी बनलेल्या कायद्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पती-पत्नीच्या घटस्फोटाचे खटले कोर्टात दिर्घकाळ  प्रलंबित राहतात. तारखांवर तारखा मिळतात परंतु न्याय मिळत नाही. याच कायद्याच्या प्रक्रियेत अतुल सुभाष नावाच्या व्यक्तीचा बळी गेला आहे. लग्नानंतर पत्नीसोबत आनंदी जीवन जगायचं स्वप्न पाहणाऱ्या अतुल यांना अग्निला साक्षी ठेवून घेणाऱ्या आगीतच आपल्याला जळून जावं लागेल याचा विचारही केला नसेल. पत्नीच्या एकापाठोपाठ एका गंभीर आरोपाने त्रस्त होऊन आणि कोर्टात न्याय मिळत नसल्याने निराशा आलेल्या अतुलने आयुष्याची लढाई अर्धवट सोडली आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. 

अतुल सुभाष यांच्या मानसिक छळाचा अंदाज यावरून लावता येईल की त्यांनी मृत्यूपूर्वी जवळपास २४ पानाची सुसाईड नोट लिहिली आहे. दीड तासाचा व्हिडिओ बनवला ज्यातून त्यांना होणारा त्रास दिसून येतो. बंगळुरूतील अतुल सुभाष यांचं लग्न उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे राहणारी निकिता सिंघानिया यांच्याशी झालं. लग्नाच्या काही दिवसापर्यंत सर्वकाही सुरळीत होते. त्यानंतर निकिता अचानक बंगळुरूवरून जौनपूरला निघून गेली. तिने पती अतुल आणि सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ आणि घरगुती हिंसाचार याचा खटला भरला.

सासरच्यांवर लावले आरोप

अतुल सुभाष याने आत्महत्येपूर्वी बनवलेल्या व्हिडिओत म्हटलंय की, माझ्या मृत्यूसाठी पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेव्हणा अनुराग सिंघानिया, चुलत सासरे सुशील सिंघानिया हे जबाबदार आहेत. पैसे हडपण्यासाठी निकिता आणि तिच्या घरच्यांनी षडयंत्र रचले. मला आणि माझ्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवले असा आरोप त्याने केला. आतापर्यंत कोर्टात १२० तारखा झाल्या, ४० वेळा मी स्वत: बंगळुरूहून जौनपूरला गेलो. आई वडील-भावालाही कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. बहुतांश तारखेला कोर्टात काहीच हाती लागलं नाही. कधी न्यायाधीश यायचे नाहीत तर कधी कामामुळे तारीख पुढे ढकलली जायची. अतुलला त्याच्या कामावर केवळ २३ सुट्टी मिळत होत्या. कायदेशीर जाचात अडकलेल्या अतुलची अवस्था बिकट झाली होती.

पत्नी निकिताने पती अतुल आणि त्याच्या कुटुंबाविरोधात ६ खटले कनिष्ठ कोर्टात आणि ३ खटले हायकोर्टात दाखल केले होते. निकिताने अतुल आणि त्याच्या घरच्यांवर हत्येचा प्रयत्न, अनैसर्गिक संभोग, घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी छळ हे आरोप केले होते. या आरोपांमध्ये जामीन मिळणेही कठीण होते. २०१९ साली पत्नीने १० लाख हुंडा मागितल्याचा आरोप केला होता त्यात धक्क्यात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला असा आरोप केला. जेव्हा तपासणी सुरू झाली तेव्हा निकिताचे वडील हार्ट पेशंट होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आले. वडिलांच्या आजारपणामुळेच घरच्यांनी निकिताचे लग्न लवकर केले होते. निकीताने पतीला घटस्फोटासाठी दर महिना २ लाख रुपये मागितले होते. मुलांनाही अतुलपासून दूर ठेवले. 

जजनं उडवली खिल्ली, लाच मागितल्याचा आरोप

जौनपूरच्या फॅमिली कोर्टातील न्यायाधीशावरही आरोप लावण्यात आले आहे की, कोर्टात तारखांसाठी लाच द्यावी लागत होती. ३ कोटी नुकसान भरपाईसाठी न्यायाधीशांनी दबाव आणला. डिसेंबर २०२४ मध्ये खटला निकाली काढण्यासाठी ५ लाखांची मागणी केली. जेव्हा पत्नी मला आत्महत्येसाठी उकसावत असल्याचं मी सांगितले तेव्हा न्यायाधीश हसायला लागले. २०२२ मध्येही समोरच्या पक्षाने ३ लाखांची मागणी केली होती. लाच देण्यास नकार दिल्याने अतुलला पत्नीला नुकसान भरपाई देण्यासाठी महिन्याला ८० हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

दरम्यान, अतुलने त्याच्या शेवटच्या व्हिडिओत न्याय प्रशासनाला आई वडिलांचा छळ करू नका असं आवाहन केले आहे. माझ्या भावाच्या परवानगीशिवाय पत्नी आणि तिच्या घरच्यांना आई वडिलांना भेटू देऊ नये. जोपर्यंत मला छळणाऱ्यांना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत माझ्या अस्थी विसर्जित करू नका. जर न्याय मिळाला नाही तर मृत्यूनंतर अस्थी कोर्टासमोरील गटारात वाहून टाका असं अतुलने म्हटलं आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय