शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

गेमच्या नादात बदलापूरची मुलगी प. बंगालला पोहोचली; पोलिसांनी मित्राला अटक केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 09:20 IST

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीला गेल्या दोन वर्षांपासून फ्री फायर या मोबाइल गेमिंग ॲपचा नाद लागला होता

अंबरनाथ : मोबाइल गेमच्या नादी लागून एक अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रासोबत घर सोडून थेट पश्चिम बंगालला पोहोचली. मात्र, घरच्यांनी तिचे अपहरण केल्याची तक्रार केल्याने ती पश्चिम बंगालला पोहोचताच पोलीस तिच्या स्वागतासाठी स्टेशनवर उभे ठाकले. एखाद्या चित्रपटात शोभावा, असा हा तपास उल्हासनगर क्राईम ब्रॅंचने करून तिला फूस लावून पळवून नेणाऱ्या तिच्या मित्राला गुरुवारी बेड्या ठोकल्या आहेत.

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीला गेल्या दोन वर्षांपासून फ्री फायर या मोबाइल गेमिंग ॲपचा नाद लागला होता. याच गेमिंग ॲपवर तिची पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात राहणाऱ्या एस. के. बुद्धू या २२ वर्षीय तरुणाशी ओळख झाली. त्यातूनच कधीच प्रत्यक्षात भेट न झालेल्या या दोघांनी थेट पळून जाण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ही मुलगी क्लासला जाते, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, तिथून तिने थेट कल्याण स्टेशन गाठले. तिथे तिचा मित्र एस. के. बुद्धू याच्यासह कर्मभूमी एक्स्प्रेस पकडून हे दोघे बंगालला रवाना झाले. 

इकडे मुलगी रात्रीपर्यंत घरी न आल्याने मुलीच्या घरच्यांनी पोलीस ठाणे गाठत मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार केली. यानंतर उल्हासनगर क्राईम ब्रॅंचनेही या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. ज्यात मुलीच्या मोबाइल लोकेशनननुसार ती कल्याण रेल्वेस्थानकावर असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानुसार सीसीटीव्ही आणि रिझर्वेशन चार्ट तपासला असता, ती कर्मभूमी एक्स्प्रेसने बंगालला गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार या गाडीचे लाईव्ह लोकेशन घेऊन पोलिसांनी पश्चिम बंगालच्या रेल्वे पोलिसांना संपर्क साधून हुगळी जिल्ह्यातील डानकुणी रेल्वेस्थानकावर या दोघांनाही उतरवून घेतले. यानंतर मुलीचे कुटुंबीय आणि क्राईम ब्रँचचे पोलीस यांनी विमानाने जाऊन या दोघांना परत आणले. यापैकी मुलीला घरच्यांच्या ताब्यात दिले असून तिचा प्रियकर बुद्धू याला पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रॅंचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली. 

पालकांच्या चिंतेत वाढबदलापूर शहरात यापूर्वीही डिसकॉर्ड नावाच्या मोबाइल गेमच्या नादी लागून एका १३ वर्षांच्या मुलाने घर सोडून गोवा गाठले होते. त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.