शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Atul Subhash : "८० लाख कमावणारा १० लाखांचा हुंडा का मागेल?"; Video मध्ये अतुल सुभाषने पत्नीबद्दल काय म्हटलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 16:01 IST

Atul Subhash : लग्नाच्या सुरुवातीपासून ते पत्नीशी झालेल्या वादापर्यंत, त्याच्यावरील प्रत्येक खटला आणि प्रत्येक मुद्दा सविस्तरपणे सांगितला आहे.

एआय इंजिनिअर अतुल सुभाष याने पत्नी आणि सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप करून आत्महत्या केली. त्याने दीड तासांचा एक व्हिडीओ आणि २४ पानांची सुसाईड नोट देखील लिहिली आहे. यामध्ये त्याने त्याच्या लग्नाच्या सुरुवातीपासून ते पत्नीशी झालेल्या वादापर्यंत, त्याच्यावरील प्रत्येक खटला आणि त्याला आत्महत्येकडे ढकलणारा प्रत्येक मुद्दा सविस्तरपणे सांगितला आहे.

सुसाईड नोटमध्ये स्वत:वरील आरोपाबाबत अतुलने लिहिलं - "माझ्यावरील हा आरोप खूपच हास्यास्पद आहे की, मी माझी पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबीयांकडून १० लाख रुपयांचा हुंडा मागितला होता. माझ्या पत्नीचा दावा आहे की, जेव्हा तिने घर सोडलं तेव्हा माझं वार्षिक उत्पन्न ४० लाख रुपये होतं आणि नंतर तिने सांगितलं की, मी वर्षाला ८० लाख रुपये कमावतो. ४० किंवा ८० लाख रुपये कमावणारी व्यक्ती १० लाख रुपयांची मागणी करेल आणि पत्नी आणि मुलांना सोडून देईल का?"

"माझ्या १० लाख रुपयांच्या मागणीमुळे तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला, असा आरोपही करण्यात आला आहे. तिने स्वत: उलट तपासणीत कबूल केलं की, तिचे वडील बऱ्याच दिवसांपासून अस्वस्थ होते. गेल्या १० वर्षांपासून ते एम्समध्ये हृदयविकार आणि मधुमेहावर उपचार घेत आहेत. पण माझ्यावर आणि माझ्या आई-वडिलांवर हत्येता आरोप केला होता" असंही अतुल सुभाषने म्हटलं. 

अतुल सुभाषने ९ डिसेंबर रोजी बंगळुरूमध्ये त्याच्या बेडरूमच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या वेळी त्याने परिधान केलेल्या टी-शर्टवर Justice Is Due असं लिहिलं होतं. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुमारे दीड तासांचा व्हिडीओ बनवला होता, ज्यामध्ये त्याने कोणत्या परिस्थितीमुळे आत्महत्या करावी लागली याचा उल्लेख केला होता. यासाठी त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींना जबाबदार धरले आहे. याशिवाय त्याने जौनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशावरही गंभीर आरोप केले आहेत.

व्हिडिओमध्ये अतुलने आरोप केला आहे की, त्याच्या पत्नीने त्याला त्याच्या साडेचार वर्षाच्या मुलाला भेटू दिलं नाही. आता मृत्यूपूर्वी अतुलने आपल्या मुलासाठी भेटवस्तू ठेवली आहे. मुलगा २०३८ मध्ये १८ वर्षांचा झाल्यावर ती भेटवस्तू उघडायची आहे. एवढंच नाही तर आपल्या पत्नीने मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करावे, जेणेकरून मुलाला चांगले संस्कार मिळतील, अशी आपली शेवटची इच्छा असल्याचं त्याने सांगितलं.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMONEYपैसाdowryहुंडा