शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

Koregaon - Bhima : सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्वीस, अरूण फरेरा यांना होऊ शकते अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 15:04 IST

सध्या हे तिघेही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानबद्ध आहेत. अटक टाळण्यासाठी या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.

पुणे - भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नजरकैदेत होते असलेल्या सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्वीस, अरूण फरेरा यांचा जामीन अर्ज आज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे या तिघांना कधीही पुणे पोलीस अटक करू शकतात. कारण, आजच या तिघांची नजरकैद संपली आहे. सध्या हे तिघेही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानबद्ध आहेत. मात्र, अटक टाळण्यासाठी या तिघांनी ७ दिवसांची नजरकैद वाढविण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.  

पुण्याच्या सत्र न्यायालयात भीमा-कोरेगाव एल्गार परिषदेप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या कथित माओवाद्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली.  या तिघांनाही २८ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुण्यात नेण्यात आलं. मात्र, सर्वोच्च न्यायालयात या कारवाईला दिलेल्या आव्हानानंतर २६ ऑक्टोबरपर्यंत या तिघांसहीत आणखी दोन आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश कोर्टानं दिले होते. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. भारद्वाज, गोन्साल्विस आणि परेरा यांच्यासोबतच गौतम नवलखा आणि वरवरा राव यांनाही अटक झाली होती. इतर दोन आरोपी म्हणजेच गौतम नवलखा आणि वरवरा राव यांच्या जामिनावर पुण्यात निर्णय होणार नाही. कारण नवलखा यांच्यावर ठेवण्यात आलेली नजरकैद उठवण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने १ ऑक्टोबर रोजी दिला होता. तर वरवरा राव यांनी पुणे पोलिसांच्या या कारवाईला हैदराबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तिथं या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयSessions Courtसत्र न्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारnaxaliteनक्षलवादी