शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

पहिल्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आहे पत्नी, पतीचा कोर्टासमोर धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 4:08 PM

Madhya Pradesh Crime News : आता महिला तरूणाला १० लाख रूपये मागत आहे. याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी महिलासहीत सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Madhya Pradesh Crime News :  मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पती-पत्नीच्या नात्याची अजब घटना समोर आली आहे. इथे एका नर्सने स्वत:ला अविवाहित सांगून गुजरातच्या तरूणासोबत लग्न केलं. त्यानंतर केवळ १७ दिवसात पतीला फसवणुकीच्या आरोप तुरूंगात पाठवलं. इतकंच नाही तर महिलेने पतीवर आरोप लावला की, त्याने स्वत:ला IAS सांगून तिच्यासोबत लग्न केलं. सोबतच तिने धमकीही दिली की, ती पहिल्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल करेल. ही धमकी देऊन पत्नीने पतीचा पासपोर्ट, पासबुक आणि कागदपत्रे जमा केले. आता महिला तरूणाला १० लाख रूपये मागत आहे. याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी महिलासहीत सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार नवीन गुप्ता वडोदऱ्याचा राहणारा आहे. त्याची फेसबुकवर भोपाळच्या राणी रॅकवारसोबत मैत्री झाली. २०१८ मध्ये दोघांची मैत्री प्रेमात बदलली. आरोप आहे की, राणीने नवीनला सांगितलं की, ती सिंगर आहे आणि भोपाळच्या जेके हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. नवीनला विश्वासात घेतल्यावर महिलेने तिच्या कुटुंबियांसोबत त्याचं बोलणं करून दिलं. कुटुंबियांच्या सहमतीने दोघांचा साखरपुडा झाला आणि ६ जून २०१९ ला भोपाळमध्ये त्यांचं लग्न झालं. तरूणानुसार, त्याने राणीला ८.५ लाख रूपयांच्या वस्तू दिल्या. ज्यात दागिनेही होते. तरूणाने पत्नीच्या अकाउंटमध्ये पैसेही जमा केले.

याप्रकरणी तरूणाच्या कुटुंबियांनी सांगितलं की, सगळं काही ठीक सुरू होतं. पण २३ जूनला परिवाराला धक्का बसला. महिलेने तिच्या मित्रांना सांगून पती विरोधात जयपूरमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस आले आणि नवीनला घेऊन गेले. तो साधारण तीन महिने तुरूंगात होता. यादरम्यान पत्नी त्याला एका मुलीला घेऊन तुरूंगात भेटायला येत राहिली. ही मुलगी तिच होती जी तिने सांगितली होती की, ती तिच्या बहिणीची मुलगी आहे.

यादरम्यान परिवाराने कसंतरी नवीनला तुरूंगातून बाहेर काढलं. तुरूंगातून बाहेर आल्यावर नवीनने पत्नीचा शोध घेतला तर त्याला समजलं की, राणी आधीच विवाहित आहे आणि तिला एक मुलगीही आहे. त्याला हेही सांगण्यात आलं होतं की, राणीच्या आई-वडिलांचा मृत्यू एका कार अपघातात झाला होता. लग्नावेळी राणीने जे शपथपत्र दिलं होतं त्यात तिने ती अविवाहित असल्याचं सांगितलं होतं. नंतर समजलं की, तिचं लग्न ६ वर्षाआधी प्रेम सिंह दांगी नावाच्या व्यक्तीसोबत झालं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी