शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

रस्त्यात झालं पती-पत्नीचं भांडण तर बाइक थांबवून दोघांनी पुलावरून घेतली उडी, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 6:20 PM

दोघेही बाइकवरून चकसाहू रोडवरील कलकलियां पुलावरून जात होते. यावेळी जोडप्यात काही कारणावरून भांडण झालं आणि...

बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका जोडप्याने छोट्याशा वादानंतर खोल पाण्यात उडली घेतली. या घटनेत तरूणाचा मृत्यू झाला तर तरूणीला बचाव दलाने वाचवलं. जीव वाचलेल्या तरूणीने मृत आपला पती असल्याचं सांगितलं. तर आत्महत्येचं कारण पती-पत्नीत सुरू असलेला वाद सांगण्यात येत आहे.

दोघेही बाइकवरून चकसाहू रोडवरील कलकलियां पुलावरून जात होते. यावेळी जोडप्यात काही कारणावरून भांडण झालं आणि बघता बघता दोघांनी पुलावरून खाली खोल पाण्यात उडी घेतली. जवळच असलेल्या मासेमारी करणाऱ्यांनी दोघांनाही पाण्यात उडी घेताना पाहिलं आणि त्यांना वाचवण्यासाठी धावून आले. मात्र, तरूणाचा मृत्यू झाला. तर तरूणीचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलं. (हे पण वाचा : बोबड्या भाषेत ६ वर्षीय मुलीने उलगडलं आईच्या हत्येचं रहस्य, डोळ्यांनी पाहिली होती तिने सगळी घटना)

मृतक तरूण वैशाली जिल्ह्यातील हसनपूर जुनैद गावात राहणारा अविनाश कुमार पटेल आहे. तर तरूणी हरैल गावात राहणारी सोनाक्षी कुमारी आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, दोघांमध्ये काही कारणावरून वाद पेटला होता. यादरम्यान ते कुणासोबत तरी व्हिडीओ कॉलवर बोलत होते आणि शिव्याही देत होते. अशात अचानक दोघांनी पुलावरून खाली पाण्यात उडी घेतली. स्थानिकांनी घटनेची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरूणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. 

दरम्यान, परिसरात चर्चा सुरू आहे की, मृत तरूणाचं आधी एका तरूणीसोबत लग्न झालं होतं आणि हरैल गावात राहणाऱ्या तरूणीसोबत त्याचं प्रेम प्रकरण सुरू होतं. यावरूनच त्यांच्यात वाद सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळावरून बाइक ताब्यात घेतली. पोलिसांनी सांगितलं की, प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि चौकशीनंतर जे समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी