शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

लग्न मोडले म्हणून कुटूंबियांवर टाकला बहिष्कार; दहा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 21:00 IST

Jaat Panchayat : मांडवा येथील जात पंचायतीचा अजब निर्णय

उमरेड : मे २०२० ला शुभमंगल ठरल्यानंतर लग्नाची तयारी सुरू झाली होती. अशातच लॉकडाऊनमुळे लग्न पुढे ढकलल्या गेले. आर्थिक परिस्थितीच्या कारणावरून वधुकडील कुटूंबियांनी लग्नापूर्वीचा झालेला ७० हजार रुपयांचा खर्च नवरदेवाला मागितला. वर मुलाने ही मागणी धुडकावून लावली. लग्न मोडले. त्यानंतर जात पंचायत बसविण्यात आली. जात पंचायतीने मुलासह संपूर्ण कुटूंबियांवर बहिष्कार टाकला. फेब्रुवारी २०२१ ते आजपर्यंत या बहिष्काराचा मन:स्ताप कुटूंबियास सोसावा लागत असल्याचा आरोप करीत उमरेड पोलीस ठाण्यात गुरुवारी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय तेजराम राठोड (३२, रा.मांडवा, ता. भिवापूर) असे तक्रारकर्त्या वर मुलाचे नाव आहे. याप्रकरणामुळे ‘जात पंचायती’च्या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. दावला दलसिंग जाधव या प्रमुख नायकासह झुमा कुंवरसिंग मेघावत, ताराचंद कुंवरसिंग मेघावत, सदाराम दादु चव्हाण, किसन गुलाब पवार, बाबासाहेब सेवु राठोड, देवाराम घोलवा राठोड, बहादुर वसराम राठोड, नेलसिंग लालसिंग पवार आणि चेलसिंग लालसिंग पवार सर्व रा.मांडवा, ता. भिवापूर अशी आरोपींची नावे आहेत.

आर्वी, जि. वर्धा येथील एका मुलीशी मांडवा येथील निवासी विजय राठोड या तरुणाचे लग्न जुळले. ५ मे २०२० ला विवाह सोहळा ठरला. वर-वधुकडील कुटूंबियांनी लग्नसमारंभाची तयारी केली होती. अशातच लॉकडाऊनमुळे तारीख पुढे ढकलल्या गेली. डिसेंबर २०२० च्या अखेरीस मुलीकडील कुटूंबियांनी लग्नापूर्वीच्या खर्चापोटी वर मुलगा विजय राठोड यास ७० हजार रुपयांची मागणी केली. विजय राठोड याने रक्कम देण्यास नकार दर्शविला. वाद वाढला. अशातच मुलीकडील मंडळींनी वर मुलाच्या मांडवा गावातच ३ फेब्रुवारी २०२१ ला जात पंचायत बसविली.

जात पंचायतीमध्ये सुद्धा मी लग्नास तयार आहे परंतु रक्कम देवू शकत नाही, अशी भुमिका विजय राठोड याने स्पष्ट केली. आरोप-प्रत्यारोप झाले. लग्न मोडले. विजय राठोड याच्यामुळे लग्न मोडल्या गेले, असा ठपका जात पंचायतीने ठेवत विजय राठोड आणि कुटूंबियांवर बहिष्कार टाकत असल्याचा निर्णय दिला. असे तक्रारीत नमूद आहे.

अशी टाकली बंदी 

३ फेब्रुवारी २०२१ ला दावला जाधव या प्रमुख नायकाच्या नेतृत्त्वात जात पंचायतीने विजय राठोड व कुटूंबियास जाती बाहेर करीत गावातील सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याची बंदीचा निर्णय जाहीर केला. कुटूंबियांना मंदिरामध्ये जाण्यास बंदी टाकल्या गेली. तक्रारकर्त्याच्या शेतात शेतमजुरांना सुद्धा जाण्यास बंदीचा निर्णय जात पंचायतीने घेतला. गावातील लोकांना विजयच्या घरी जाण्याची बंदी टाकण्यात आली, अशी बाब तक्रारीत नमूद आहे.

कुटूंब दहशतीत 

उमरेडपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडवा या गावाला लागून लभान (मांडवा) हे दुसरे गाव आहे. या परिसरात फेब्रुवारी महिन्यात मोठी यात्रा भरते. या यात्रेदरम्यान मंदिरात विजय राठोड याच्या आईला प्रवेश नाकारला गेला. काकाच्या मुलाच्या लग्नालाही थांबविण्यात आले, असा आरोप विजय राठोड याने केला आहे. जात पंचायतीच्या बहिष्काराच्या निर्णयानंतर आई-वडिल, भाऊ आणि मी असे संपूर्ण कुटूंब दहशतीत असल्याची कैफीयत विजय राठोड याने लोकमतजवळ मांडली.

गुन्हा दाखल, तपास सुरु 

मांडवा येथील बंजारा समाजाच्या जात पंचायतीने विजय व त्याच्या कुंटूबियांस समाजातून बहिष्कृत केल्याने विजयच्या तक्रारीवरून उमरेड पोलीस ठाण्यात १५३ ब, ३४ भादवि सहकलम ३,५ महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम २०१६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राजीव लोले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :marriageलग्नnagpurनागपूरPoliceपोलिस