शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

सनकी प्रियकराचं डोकं भडकलं, प्रेयसीच्या घरी जात संपूर्ण कुटुंबाला संपवणार होता, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:57 IST

एकेदिवशी राजूचा भाऊ आसारामला घरातील कपाटात कपड्यांमध्ये लपवलेला मोबाईल सापडला

जयपूर - प्रेम आंधळं असतं अशी म्हण खूप प्रचलित आहे पण खरेच असं असतं का? हा, जेव्हा कधी एकतर्फी प्रेमातून सनकी व्यक्ती काही पाऊल उचलतो तेव्हा ते हैराण करणारं असते. शुक्रवारी जयपूर इथं पती-पत्नीची गोळी मारून हत्या केली आहे. या हत्येतील गुन्हेगारांना जेव्हा पोलिसांनी अटक केली, त्याच्या चौकशीतून जे समोर आलं ते सगळ्यांसाठी धक्कादायक होते. आरोपी एका महिलेवर प्रेम करत होता आणि तिचा पती, मुले त्या प्रेमात अडसर होते, त्यामुळे त्यांना धडा शिकवायचा असं प्लॅनिंग त्याच्या डोक्यात शिजत होते. 

आरोपीने दागिने विकून देशी कट्टा खरेदी केला आणि हत्या करण्यासाठी पोहचला. मुले शाळेत गेली होती म्हणून बचावली. घरात महिला आणि तिचा पती होता. पतीला गोळी मारल्यानंतर पत्नी जोरदार किंचाळली तेव्हा तिच्यावरही गोळी झाडण्यात आली. राजूराम मीणा त्याची पत्नी आशा मीणा, भाऊ आसाराम मीणा, बहीण मिनाक्षी आणि मुलासह शांतीविहार कॉलनीत राहत होते. राजूची पत्नी आशा मीणा, त्याचा भाऊ आसाराम आणि हत्या करणारा आरोपी मोनू पंडित एकाच फॅक्टरीत काम करत होते. मोनू आणि आशा एकमेकांशी बोलायचे. बोलणं होण्यासाठी मोनूने आशाला मोबाइलही दिला होता. दोघांमध्ये अनेकांच्या नकळत संवाद व्हायचा. काही दिवसांपूर्वीच आशाचा नवरा आणि दीर यांना ती मोनूशी बोलत असते हे कळलं, त्यानंतर राजूराम मीणा आणि आसारामने मोनूला खडसावत आशाशी बोलू नकोस अशी धमकी दिली.

घरात लपवलेला मोबाईल सापडला

एकेदिवशी राजूचा भाऊ आसारामला घरातील कपाटात कपड्यांमध्ये लपवलेला मोबाईल सापडला. त्यादिवशी आशा फॅक्टरीत कामाला गेली होती. ती जेव्हा घरी परतली तेव्हा पती आणि दीराने मोबाईल कुठून आला म्हणून विचारणा केली. हा मोबाईल मोनूनं त्याच्याशी बोलण्यासाठी दिलाय असं आशाने घरच्यांना सांगितले. त्यानंतर आशाचा नवरा आणि आसाराम दोघांनी फॅक्टरीत जात मोनूशी वाद घातला. भविष्यात पुन्हा हे करू नकोस असं बजावले. या घटनेपासून राजूने त्याच्या पत्नीला फॅक्टरीत काम करण्यास पाठवायचं बंद केले. 

बदला घेण्यासाठी घरी आला अन् गोळी झाडली

आशा ७ दिवसांपासून कामाला जात नव्हती. मोनूही ३ दिवस गायब होता. शुक्रवारी राजू मीणाला कॉल करून त्याने घरी येतोय, आपल्यातील वाद संपवण्यासाठी बोलायचं आहे असं सांगितले. राजूने त्याला घरी येण्यास मनाई केली तरी तो सकाळी ११ वाजता घरी आला. त्यावेळी राजूची छोटी बहीण मिनाक्षी घरात होती. राजूने बहिणीला बाहेर पाठवून मोनूशी बोलत होता. त्याचवेळी अचानक मोनूने देशी कट्टा बाहेर काढला आणि राजूच्या डोक्यात गोळी झाडली. हा आवाज ऐकून आशाही बाहेर आली तेव्हा तिच्यावरही मोनूने गोळी चालवली. 

संपूर्ण कुटुंबाला संपवायचं होतं, पण...

आशाच्या प्रेमात वेडा झालेला मोनू पंडितला राजूच्या पूर्ण कुटुंबाला संपवायचे होते. राजू आणि आशाची हत्या करून तो मुलांच्या स्कूलमध्येही गेला परंतु शाळेने त्याला प्रवेश दिला नाही तर राजूचा भाऊ आसाराम फॅक्टरीत गेला होता. बहीण दुसऱ्याच्या घरी गेली होती त्यामुळे मोनूला त्यांचीही हत्या करता आली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी