शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

बहिणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भाऊ २ वर्ष कैदेत; आता कोर्टासमोर खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 17:03 IST

२०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीनं पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवली होती. या मुलीनं तक्रारीत म्हटलं होतं की, २०१७ मध्ये जेव्हा मी घरात कुणी नव्हतं तेव्हा माझ्या भावानं माझ्यावर बलात्कार केला

ठळक मुद्देपीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तात्काळ दखल घेत कारवाई केली. हे प्रकरण कोर्टात पोहचलंअल्पवयीन मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला जात होती.ही गोष्ट तिच्या भावाला समजल्यानंतर त्याने बहिणीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला विरोध केला

मुंबई – शहरातील कोर्टाने एका व्यक्तीला अल्पवयीन बहिणीचा बलात्कार केल्याचा आरोपाखाली दोषी ठरवत त्याला २ वर्षाची शिक्षा सुनावली. आरोपी भाऊ २ वर्ष जेलमध्ये बंद होता. परंतु आता त्याच्या बहिणीनं कोर्टासमोर सत्य आणल्यानं मोठा खळबळजनक खुलासा झाला आहे. खोटं बोलून भावाची फसवणूक केल्याचं बहिणीनं कोर्टासमोर कबुल केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळचं वळण लागलं आहे.

२०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीनं पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवली होती. या मुलीनं तक्रारीत म्हटलं होतं की, २०१७ मध्ये जेव्हा मी घरात कुणी नव्हतं तेव्हा माझ्या भावानं माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा २०१८ मध्ये पुन्हा संधी मिळताच त्याने तोच प्रकार केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तात्काळ दखल घेत कारवाई केली. हे प्रकरण कोर्टात पोहचलं. पोलीस तपास, मुलीचा जबाब आणि दोन साक्षीदारांच्या हवाल्याने कोर्टात भावाला दोषी ठरवण्यात आलं. कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावली. आरोपी २ वर्ष कैदेत होता. त्यानंतर आता आरोपीची बहिण दिंडोशी कोर्टात पोहचली आणि तिने भावाने माझा बलात्कार केला नाही असं कबुल केले आहे.

काय आहे प्रकरण?

अल्पवयीन मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला जात होती. ही गोष्ट तिच्या भावाला समजल्यानंतर त्याने बहिणीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला विरोध केला. अनेकदा मारहाणही केली. त्यावरुन नाराज झालेल्या बहिणीनं भावाविरोधात तक्रार दाखल केली. आता या मुलीच्या कबुलीनाम्यावरुन कोर्टाने आरोपीला निर्दोष ठरवत त्याची सुटका केली आहे. याचबरोबर युवकाच्या बहिणीनं तक्रार दाखल करताना तिची मेडिकल चाचणी केली नव्हती असंही सांगितलं आहे.

आता या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २ वर्ष या युवकाचं जे नुकसान झालं त्याची भरपाई कोण करणार? अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. डॉ. मनस्वी अस्थाना म्हणतात की, अशाप्रकारे खोट्या तक्रारी आणि घरगुती वादातून नात्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे. हे भविष्यासाठी चांगले नाही. लोकांमधील भावनिक नातं संपत चाललं आहे. खोट्या तक्रारी देऊन बदला घेण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यासाठी तोडगा काढायला हवा असं त्यांचे म्हणणं आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCourtन्यायालय