शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

बाबो! पत्नीच्या हत्येप्रकरणी पती जेलमध्ये गेला अन् 'ती' 12 वर्षांनी प्रियकराच्या घरी जिवंत सापडली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 12:55 PM

ज्या पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला तुरुंगात राहावे लागले, ती पत्नी तब्बल 12 वर्षांनंतर अचानक भेटली.

अमेठीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीला कोणताही गुन्हा न करता तुरुंगवास भोगावा लागला. ज्या पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला तुरुंगात राहावे लागले, ती पत्नी तब्बल 12 वर्षांनंतर अचानक भेटली. रायबरेली जिल्ह्यातून पतीला पत्नी सापडली. त्यामुळे आता त्याचे कुटुंबीय याप्रकरणी तोडगा काढण्याची मागणी करत आहेत. हे संपूर्ण प्रकरण अमेठी जिल्ह्यातील जायस पोलीस ठाण्याच्या अली नगर भागातील आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज कुमार वर्मा पत्नी सीमा वर्मासोबत राहत होते. 25 मार्च 2011 रोजी तरुणाची पत्नी सीमा वर्मा अचानक गायब झाली. खूप शोध घेऊनही पत्नी सापडली नाही. मनोजच्या सासरच्यांनी सीमा वर्माचा पती मनोज वर्माविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्याच्यावर स्वत:च्या पत्नीची हत्या करून मृतदेह लपवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मनोजला 11 दिवस तुरुंगवास भोगावा लागला.

कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर मनोज सतत त्याच्या पत्नीचा शोध घेत होता. यासोबतच या प्रकरणाबाबत ते न्यायालयाच्या चकरा मारत होते. त्याचवेळी 11 वर्षांनंतर 10 जानेवारी 2023 रोजी मनोजला त्याची पत्नी जिवंत असल्याची माहिती मिळाली. मनोजने याबाबत चौकशी केली असता त्याला समजले की, त्याची पत्नी आपल्या तीन मुलांसह तिच्या प्रियकराच्या घरी राहते. त्यानंतर मनोजने रायबरेली जिल्ह्यातील भडोखर पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पत्नीचे जबाब घेऊन अन्य कायदेशीर कारवाई केली.

पीडितेचा पती मनोजने सांगितले की, त्यांची पत्नी सीमा ही रायबरेली येथील रहिवासी असून, 12 वर्षांपूर्वी एका व्यक्तीसोबत पळून गेली आणि तिचे लग्न झाले. हे माहीत असतानाही त्यांच्या कुटुंबीयांनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आम्हाला तुरुंगवास भोगावा लागला. आम्हाला निर्दोष सिद्ध करता यावे यासाठी पत्नीने न्यायालयात हजर व्हावे, अशी आमची इच्छा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी