शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

खळबळजनक! हत्येच्या संशयावरून तरुणाला जिवंत जाळलं; गावकऱ्यांनी दिली तालिबानी शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 2:41 PM

Crime News : एका तरुणाला रॉकेल टाकून जिवंत जाळल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरण्यात आला.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान आसाममध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका तरुणाला रॉकेल टाकून जिवंत जाळल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरण्यात आला. तरुणावर एका नवविवाहितेला मारण्याचा आरोप होता. त्यानंतर गावकऱ्यांनी स्वत:च कोर्ट भरवलं आणि त्याला शिक्षा दिली. या प्रकरणाची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील नौगाव जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील बोर लालुंग भागात ज्या तरूणाला जनसुनावणीनंतर जिवंत जाळण्यात आलं त्याचं नाव रंजीत बोरदोलाई असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला संध्याकाळी 6 वाजता जनसुनावणीनंतर एका व्यक्तीला जिवंत जाळून मारण्यात आल्याची माहिती मिळाली. त्याच्यावर हत्येचा आरोप होता. जाळल्यानंतर त्याचा मृतदेह पुरण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

नौगावमधील ज्या गावात ही घटना घडलीय, तिथं कार्बी समाजाचे अनेक लोकं आहेत. गावातील एका व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, 'तीन दिवसांपूर्वी या भागात महिलेचा मृतदेह मिळाला. या महिलेचं नुकतंच लग्न झालं होतं. तिची हत्या करून गावाच्या तलावात मृतदेह फेकून देण्यात आला होता.' त्या व्यक्तीनं दावा केला की, 'रंजीतने महिलेची हत्या केल्याचं काही महिलांनी ऐकलं होतं, त्यानंतर गावात जनसुनावणी झाली. यामध्ये त्या महिलांना साक्षीसाठी बोलवण्यात आलं. 

सुनावणीच्या दरम्यान रंजीत बोरदोलोईने हत्या केल्याची कबुली दिली. आपण 5 जणांसोबत या महिलेचे हत्या केल्याचं त्याने सांगितलं. रंजीतने सर्वांसमोर गुन्हा कबुल केल्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या काही जणांनी त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही जणांनी त्याच्यावर केरोसिन टाकलं आणि पेटवून दिलं अशी माहिती त्या व्यक्तीने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.