शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

भयंकर! "तिच्याशिवाय मी कसा जगू?"; प्रेयसीच्या मृत्यूनंतर 12 दिवसांनी प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 12:34 PM

Crime News : प्रेयसीच्या मृत्यूनंतर 12 दिवसांनी प्रियकराने टोकाचं पाऊल उचललं आहे. तिच्या बाराव्यालाच बॉयफ्रेंडने स्वत:ला संपवलं आणि लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट झाला आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही जण वाटेल ते करतात. कधी कधी याच प्रेमातून अनेक धक्कादायक घटना देखील घडतात. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. प्रेयसीच्या मृत्यूनंतर 12 दिवसांनी प्रियकराने टोकाचं पाऊल उचललं आहे. तिच्या बाराव्यालाच बॉयफ्रेंडने स्वत:ला संपवलं आणि लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट झाला आहे. तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

ज्या दिवशी प्रेयसीचं बारावं होतं, त्याच दिवशी प्रियकराचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रेयसीच्या मृत्यूनंतर प्रियकर खूप दु:खी झाला होता. त्याच निराशेतून त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील लिंगज पोलीस ठाणे हद्दीतील अमरोली गावातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. 

12 दिवसांपूर्वी या तरुणाच्या प्रेयसीने आत्महत्या करून स्वत:च जीवन संपवलं होतं. प्रेयसीच्या मृत्यूनंतर प्रियकराला खूप मोठा धक्का बसला होता. प्रेयसीच्या मृत्यूच्या दु:खात तरुणाने हे भयावह पाऊल उचलल्याची शक्यता आहे. "ती आता या जगात नाही. तिच्याशिवाय मी कसा जिवंत राहू" असं नेहमी तरुण म्हणायचा. त्याच्या कुटुंबाने त्याची खूप समजून काढली पण तो ऐकायलाच तयार नव्हता. 

तरुणाच्या मृत्यूची सूचना मिळताच त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. सध्या पोलीस तपास करीत आहे. पोलिसांकडून आत्महत्येशिवाय हत्येच्या पैलूनेही तपास केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी