शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

Crime News: ७ वर्षांच्या मुलीसमोर पत्नीची केली क्रूरपणे हत्या, त्यानंतर स्वत:ही केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 6:49 PM

Crime News: छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यातील हसौद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अमलीडीह गावात पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, मृत दाम्पत्याच्या मुलीने दिलेल्या जबाबामधून धक्कादायक कारण समोर आलं आहे. 

रायपूर - छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यातील हसौद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अमलीडीह गावात पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, मृत दाम्पत्याच्या मुलीने दिलेल्या जबाबामधून धक्कादायक कारण समोर आलं आहे. 

याबाबतची सविस्त हकीकत अशी, येथे राहणाऱ्या मनोज बरेठ याचा विवाह १० वर्षांपूर्वी रमशीला हिच्याशी झाला होता. दोघांनाही एक सात वर्षांची मुलगी आहे. मनोज हा पत्नी रमशीला हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यावरून पती पत्नीमध्ये खूप वाद होत असत. २३ ऑगस्ट रोजी रात्री दोघांमध्ये या विषयावरून कडाक्याचं भांडण झालं. हा वाद एवढा वाढला की मनोजने संतापून आपल्या ७ वर्षांच्या मुलीसमोरच पत्नी रमशीला हिची धारदार हत्याराने वार करून हत्या केली. 

त्यानंतर तो घरातून फरार झाला. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हत्येचा गुन्हा दाखल केला. तसेच मृत रमशीला हिच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. तसेच फरार मनोज याचा शोध सुरू केला. यादरम्यान, मनोज बरेठ याने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केली असून, त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीमध्ये पडला असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. 

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जात मनोजचा मृतदेहही ताब्यात घेतला. त्यानंतर पंचनामा करून दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले. आता या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. दरम्यान जांगगीरचे एसपी विजय अग्रवाल यांनी सांगितले की, मनोज आणि रमशील यांच्या मुलीने जबाबात सांगितले की, घरात तिचे आई-वडील दररोज भांडण करायचे. ही घटना घडली त्या रात्रीही आई-वडलांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. आता पोलीस आसपास आणि ओळखीच्या लोकांकडे चौकशी करत आहेत. तसेच प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारChhattisgarhछत्तीसगड