शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

भयंकर! मोबाईल दिला नाही म्हणून नववधूने टोकाचं पाऊल उचललं; आत्महत्या करून जीवन संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 3:28 PM

Crime News : नवीन मोबाईलची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून एका नवविवाहितेने विष घेऊन आत्महत्या केली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलसाठी एका नववधूने टोकाचं पाऊल उचललं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यामध्ये नवीन मोबाईलची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून एका नवविवाहितेने विष घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी रात्री तिने टोकाचा निर्णय घेतला. तिने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मेडिकल कॉलेज झाशी येथे जाण्यास सांगितलं. 

उपचारासाठी घेऊन जात असतानाच रस्त्यातच महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोतवाली परिसरातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. चंद्रशेखर यांनी आपली मुलगी अंगुर हिचं लग्न नरेंद्र सोबत ठरवलं होतं. तिने आपला दीर सुमितच्या माध्यमातून सासऱ्यांकडे मोबाईलची मागणी केली होती.

सासऱ्याने देखील मोबाईल फोन देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण मोबाईल न मिळाल्याने तिने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. महिलेच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सासरच्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची मानसिक अवस्था ठीक नव्हती. तिच्या सर्व इच्छा नेहमीच पूर्ण केल्या जात होत्या. पण त्यानंतर पुन्हा आता ती मोबाईल हवा असा हट्ट करत होती. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी