शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

क्रूर आई! पहिले सख्खा नंतर सावत्र मुलाला आईने संपवले; गोणीत भरून फेकून दिला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 21:08 IST

Murderous moms in Ahmedabad:पोलिसांनी या महिलेने १५ वर्षांपूर्वी आपल्या ११ वर्षीय मुलाची देखील हत्या केली असल्याचे सांगितले. गौरीने ७ वर्षांपूर्वी हार्दिकचे वडील राजनीकांतशी लग्न केले. 

ठळक मुद्देमुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह एका गोणीत भरून अहमदाबमधील दस्करोई तालुक्यातील कुंजड गावात फेकून दिला. गौरी पटेल असं या आरोपी महिलेचं नाव आहे.

अहमदाबाद - ४८ वर्षीय एका महिलेने आपल्या २१ वर्षीय सावत्र मुलगा हार्दिक पटेल याची गळा आवळून हत्या केली. मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह एका गोणीत भरून अहमदाबमधील दस्करोई तालुक्यातील कुंजड गावात फेकून दिला. गौरी पटेल असं या आरोपी महिलेचं नाव आहे. पोलिसांनी या महिलेने १५ वर्षांपूर्वी आपल्या ११ वर्षीय मुलाची देखील हत्या केली असल्याचे सांगितले. गौरीने ७ वर्षांपूर्वी हार्दिकचे वडील राजनीकांतशी लग्न केले. 

हार्दिकचा लहान भाऊ उमंग पटेल कांभा भागात दुधाची डेअरी चालवतो. त्याने पोलिसांना जबाबात सांगितलं की, सावत्र आई गौरी आणि भाऊ हार्दिक नेहमी पैशांवरुन भांडण करीत होते. माझी सावत्र आई आमच्या डेअरी व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली नातेवाईक आणि वडिलांच्या मित्रांकडून पैसे उधार घेत होती. मात्र, हे पैसे तिने कधीच डेअरीसाठी खर्च केले नाही. उमंगने आरोप केला आहे की, गौरीने अशा प्रकारे पैसे जमवून नातेवाईकांकडून २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हार्दिकला कोरोना, लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे डेअरी व्यवसायाचे खूप नुकसान झाले होते. जेव्हा या नातेवाईकांनी पैसे परत मागितले तेव्हा नेमका प्रकार समोर आला. 

मंगळवारी सकाळी हार्दिक घरात एकटा झोपलेला होता आणि उमंग डेअरीवर होता. गौरीने नाशिकमधील आपले तीन नातेवाईक संजय, अनिल, दिनेश यांच्यासह मिळून हार्दिकचा गळा आवळला. यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह एका गोणीत भरून फेकून दिला, अशी माहिती येथील पोलिसांनी दिली आहे. उमंग जेव्हा घरी परतला तेव्हा रात्री उशिरा हार्दिक घरी परतना नाही म्हणून त्याने गौरीकडे याबाबत विचारणा केली. मात्र तिने उत्तर दिलं नाही. यावेळी त्याने शेजारच्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की, गौरीचे तीन नातेवाईक एका गोणीत काही तरी भरून घेऊन जात होते. दरम्यान पोलिसांना कांभा येथील झुडपांमध्ये एक मृतदेह सापडला आणि हा हार्दिकच होता. या प्रकरणात गौरीची चौकशी केल्यानंतर तिने गुन्हा कबुल करत आपल्या तीन नातेवाईकांची नावं सांगितली.

पोलिसांच्या चौकशीत गौरीने आणखी एक धक्कादायक माहिती दिली. जेव्हा ती २०१४ साली नाशिकमध्ये काम करीत होती, तेव्हा तिने आपल्या ११ वर्षांच्या मुलाचीही हत्या केली होती. यावेळी पोलिसांना खोटं कारणं सांगून ती कशीबशी यातून सुटली होती. त्यानंतर २०१५ साली तिने दुसरं लग्न हार्दिकचे वडील रजनीकांत यांच्याशी केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातPoliceपोलिसDeathमृत्यू