शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

पाकिस्तानात बसून दाऊदचं भारताविरोधात षडयंत्र; NCB नं केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 18:05 IST

देशाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे डी गँग आणि ड्रग्जचा काळा धंदा करणाऱ्यांमध्ये संबंध वाढले आहेत.

नवी दिल्ली - भारत हा नेहमीच पाकिस्तान, अंडरवर्ल्ड माफिया आणि दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिला आहे. या सर्वांचा पाकिस्तानशी थेट संबंध आहे. गेल्या काही काळापासून कराचीत बसलेल्या प्रमुख दहशतवाद्यांनी भारतात अशांतता पसरवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा वापर करत आहे. दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉनच्या मदतीने देशातील तरुणांना बिघडवण्याचा कट पाकिस्तान रचत आहे. देशातील अमली पदार्थांच्या तस्करीच्या वाढत्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या विविध यंत्रणांनी आता मोठा खुलासा केला आहे. 

देशाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे डी गँग आणि ड्रग्जचा काळा धंदा करणाऱ्यांमध्ये संबंध वाढले आहेत. NCB ने नुकतेच भारतीय नौदलासोबत केलेल्या संयुक्त कारवाईत ६० किलो उच्च दर्जाचे एमडी ड्रग जप्त केले होते. ज्याची किंमत अंदाजे १२० कोटी रुपये होती. त्याचवेळी नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरातून जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ आणि मुंबई विमानतळावरील सफरचंद संत्र्याच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेले ५० किलोहून अधिक कोकेन यांची किंमत ५०० कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. पकडलेल्या या सर्व ड्रग्जच्या आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर एनसीबीला धक्कादायक माहिती मिळाली.

दाऊद इब्राहिम मोठा कट रचतोय एनसीबीच्या अधिका-यांनी सांगितले की, दीड वर्षात एनसीबीने आठ यशस्वी ऑपरेशन्स केले, त्यानंतर या सर्व ड्रग्समध्ये एक पॅटर्न आढळला ज्यांचे कनेक्शन दाऊद इब्राहिम, ड्रग माफिया हाजी सलीम आणि पाकिस्तानात बसलेल्या इसिसशी आहे. NCB झोनल डायरेक्टर अमित घावटे यांनी सांगितले की, अंमली पदार्थांची ही संपूर्ण खेप अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराणमधून सतत येत आहे. ती भारतासाठी घातक बनली आहे. या मार्गाने तस्कर केवळ ड्रग्जच नव्हे तर एके ४७ सारख्या धोकादायक शस्त्रांचीही तस्करी करतात, असा खुलासा या अधिकाऱ्याने केला आहे. मात्र हे गुन्हेगार इतके हुशार आहेत की ते वेळोवेळी आपले मार्ग बदलत असतात.

मुंबई टार्गेटवरजर त्यांना मुंबईत ड्रग्जचा पुरवठा करायचा असेल तर ते आधी देशाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर ड्रग्सची खेप उतरवतात. नंतर त्यांच्या नेटवर्कद्वारे पुरवठा करतात. कराचीहून येणारी हे ड्रग्स इराणी बोटींच्या मदतीने भारतात येतात. हे तस्कर बोटींचाही सहारा घेतात जेणेकरून पकडले गेल्यास ते ड्रग्जच्या खेपेचे पुरावे नष्ट करण्यासाठी समुद्रात फेकून देऊ शकतात. एनसीबीने सांगितले की, डी गँगचे हे तस्कर भारताच्या वापर करून इतर देशांमध्ये ड्रग्सचा पुरवठा करतात. या खुलाशानंतर देशात वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यापात अनेक तरुण मुले येत आहेत आणि ही संख्या वाढत आहे अशी भीती यंत्रणांना वाटते. या ड्रग्जच्या विक्रीतून मिळालेला पैसा हे दहशतवादी शस्त्रास्त्रांच्या खरेदीत वापरतात. त्यामुळे एजन्सी याकडे देशाविरुद्ध प्रॉक्सी वॉर म्हणून पाहत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDawood Ibrahimदाऊद इब्राहिमPakistanपाकिस्तान