शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘त्या’ फाटक्या नोटेनं उलगडलं दुहेरी हत्याकांडाचं कोडं; आईलेकाची हत्या करणाऱ्याला २४ तासांत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 13:27 IST

मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता दिल्लीच्या पालम विहार परिसरात २७ वर्षीय गौरव आणि त्याची आई बबिता यांची हत्या करण्यात आली होती

ठळक मुद्दे एअरफोर्समध्ये असलेले स्वरुप सुधीर जेव्हा त्यांच्या कार्यालयातून घरी पोहचले तेव्हा पत्नी आणि मुलाची हत्या झाल्याचं दिसून आलंघरात एका व्यक्तीची एन्ट्री झाली. घराच्या बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेराचे डीवीआरही गायब झाले.पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले तेव्हा एक संशयित त्यांना दिसून आला.

नवी दिल्ली – राजधानीच्या दिल्लीच्या पालम गावात एअरफोर्स कर्मचाऱ्याच्या मुलाची आणि पत्नीची हत्या झाल्याने खळबळ माजली होती. या हत्याकांडाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. ही हत्या दुसऱ्या कुणी केली नसून खुद्द पीडित कर्मचाऱ्याच्या मेव्हण्याच्या मुलाने केली आहे. हत्येमागे आर्थिक व्यवहार असल्याचं समोर आलं आहे. एका ३० रुपयाच्या फाटलेल्या नोटेवरून पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला आहे.

मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता दिल्लीच्या पालम विहार परिसरात २७ वर्षीय गौरव आणि त्याची आई बबिता यांची हत्या करण्यात आली होती. एअरफोर्समध्ये असलेले स्वरुप सुधीर जेव्हा त्यांच्या कार्यालयातून घरी पोहचले तेव्हा पत्नी आणि मुलाची हत्या झाल्याचं त्यांना दिसून आले. गौरव हैदराबाद येथे डेल कॅम्प्युटर येथे नोकरीला होता. परंतु मागील १ वर्षापासून काम नसल्याने तो घरीच होता. तपासात समोर आलं की, घरात एका व्यक्तीची एन्ट्री झाली. घराच्या बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेराचे डीवीआरही गायब झाले. घरातील एक कपाट खुले होते. त्यामुळे या घटनेमागे लुटमारीची शक्यता असल्याचं पोलिसांना वाटत होते. पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले तेव्हा एक संशयित त्यांना दिसून आला. हा संशयित दशरथपुरी मेट्रो स्टेशनवर एका ई रिक्षातून उतरताना दिसला.

पोलिसांनी पहिल्यांदा ई रिक्षा आणि त्याच्या मालकाचा शोध घेतला. ई रिक्षाच्या मालकाला विचारले असता त्याने सांगितले एक व्यक्ती माझ्या रिक्षात बसला होता. त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. परंतु रिक्षावाल्याने त्याला याबाबत विचारले असता त्याने काही उत्तर दिले नाही. त्यानंतर माझ्या रिक्षाचे भाडे ३० रुपये झाले होते. परंतु त्या व्यक्तीकडे फाटलेली नोट होती त्यामुळे ती घेण्यास मी नकार दिला. त्यानंतर त्या व्यक्तीने पेटीएममधून रिक्षावाल्याच्या मोबाईलवर ३० रुपये ट्रान्सफर केले. पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि नाव घेतले.

हा आरोपी अभिषेक वर्मा होता. बबिताच्या भावाचा मुलगा अभिषेकला पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. आरोपीची चौकशी केली असता त्याने सांगितले की, काही महिन्यांपूर्वी मी माझ्या आत्याकडून लग्नासाठी ५० हजार रुपये उधार घेतले होते. आत्या वारंवार त्या पैशांबाबत माझ्याकडे विचारणा करत मला वाटेल तसे बोलत होती. त्यामुळे आत्या आणि तिच्या मुलाची हत्या करण्याचं षडयंत्र रचलं. घटनेच्या २ दिवसआधी अभिषेक बबिताच्या घरी आला होता. तेव्हा आर्थिक व्यवहारांवरून बबिता आणि अभिषेक यांच्यात भांडण झालं.

त्यानंतर मंगळवारी हत्या करण्याच्या हेतून अभिषेक स्कूटी घेऊन आला. त्याने स्कूटी दशरथपुरी मेट्रो स्टेशनजवळ पार्क केली. त्यानंतर ई रिक्षातून बबिताच्या घरी गेला. त्याठिकाणी बबिता आणि त्याच्या मुलाची हत्या केली. ही लुटमारीतून हत्या झाली असा बनाव करण्यासाठी त्याने घरातील कपाट उघडं केले होते. त्यानंतर बाहेरील सीसीटीव्हीची डिवीआर काढून घेतला. ई रिक्षातून पुन्हा दशरथपुरी मेट्रो स्टेशनला पोहचलो असं तपासात आरोपीने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस