शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Video: 31 डिसेंबरच्या रात्री अंजलीसोबत नेमकं काय घडलं? मैत्रिणीने सांगितली हॉटेल अन् बॉयफ्रेंड वाली कहानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 21:21 IST

दिल्लीतील कंझावाला परिसरात 31 डिसेंबरच्या रात्री एका तरुणीला कारने चिरडून ठार केल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील कंझावाला इथं 31 डिसेंबरच्या रात्री कारनं चिरडून झालेल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आज मंगळवारी शवविच्छेदनानंतर अंजलीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, अंजलीच्या मैत्रिणीनं पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री अंजली तिची मैत्रिण निधीसोबत आली होती. निधीनं या प्रकरणाशी संबंधित अनेक न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. 

अंजलीची मैत्रिण निधी हिनं 31 डिसेंबरच्या रात्रीचा सर्व तपशील पोलिसांसमोर मांडला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री तिची मैत्रीण निधी अंजलीसोबत तिच्या स्कूटीवर गेली होती. मात्र तिला या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही. विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितले की, ती (अंजलीची मैत्रीण निधी) खूप घाबरली होती, त्यामुळे जेव्हा अपघात झाला तेव्हा ती अंजलीला सोडून पळून गेली.

निधी म्हणाली, "मी तिला (अंजली) फक्त 15 दिवसांपासून ओळखत होते, पण आमची खूप लवकर मैत्री झाली. आम्ही नवीन वर्ष एकत्र साजरे करण्याचा निर्णय घेतला. 31 डिसेंबरला तिने मला फोन केला आणि मला घेण्यासाठी सुलतानपुरीत आली. त्यानंतर आम्ही रोहिणीला गेलो. ती मला तिच्या घरी घेऊन गेली, मग आम्ही हॉटेलवर गेलो."

निधीने पुढे सांगितले की, ती आणि अंजली पहाटे दोनच्या सुमारास हॉटेलमधून निघाले होते. अंजली चिडलेली होती. ती म्हणत होती की जर तिचा प्रियकर तिला भेटला नाही तर ती मरेल. मी तिला स्कूटी थांबायला सांगितली, पण तिनं थांबवली नाही. काही क्षणातच त्यांच्या स्कूटीला एका गाडीला धडक दिली. यावेळी अंजली कारखाली अडकली, ती वेदनेने खूप व्हिवळत होती, पण गाडीतील लोकांनी तिचा आवाज ऐकून न ऐकल्यासारखा केला आणि जाणीवपूर्वक गाडी पळवली.  गाडी थांबली असती तर अंजलीला वाचवता आलं असतं. पण, गाडीत बसलेल्या लोकांनी प्रयत्नही केला नाही. ते अंजलीला कारने ओढत पळून गेले. 

1 जानेवारीला काय झालं?

एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करणारी 23 वर्षीय अंजली 31 डिसेंबरच्या संध्याकाळी अमन विहारमधील तिच्या घरातून नवीन वर्षाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी निघाली होती. 1 जानेवारीच्या पहाटे, पोलिसांना माहिती मिळाली की एक राखाडी रंगाची बलेनो एक मृतदेह ओढत आहे. पहाटे 4.11 वाजता जोंटी गावातील हनुमान मंदिराजवळ पोलिसांना मृतदेह आढळून आला. अंजलीच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा होत्या, कपडे फाटलेले होते आणि दोन्ही पाय शरीरापासून वेगळे झाले होते. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी31st December party31 डिसेंबर पार्टी