शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
2
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
3
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
4
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
5
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
6
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात
7
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
8
चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
9
Khyati Global Ventures IPO Listing : लिस्ट होताच 'या' शेअरला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांची निराशा; डोकं धरण्याची आली वेळ 
10
निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतीच्या २८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
11
Demat Account Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार
12
सूरजसाठी थेट सिनेमा कसा जाहीर केला? केदार शिंदे स्पष्टच म्हणाले- "स्क्रिप्ट आधीच रेडी होती पण..."
13
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
14
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
15
Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
16
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
17
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
18
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
19
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती

नियतीला ते मान्य नव्हते! शेतकरी जोडप्याने गळफास घेतला, पण एकाची दोरी तुटली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 10:43 AM

शेताजवळून दोन पोलीस जात होते, पोलिसांना काय प्रकार घडला असेल ते समजून आले. त्यांनी लगेचच शेताकडे धाव घेतली.

उत्तर प्रदेशच्या आग्र्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी पत्नी-पत्नीने झाडाला दोऱ्या बांधून गळफास घेतला, परंतू पत्नीचा दोर तुटल्याने ती बचावली तर पतीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आग्र्यापासून ५० किमी दूर फतेहपूरच्या सीकरी भागात घडली आहे. 

मान सिंह आणि त्याची पत्नी संता देवी हे आपल्या घराशेजारीच असलेल्या शेतात गेले होते. घरातील वादाला कंटाळून त्यांनी तेथील रस्सी झाडाला बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. दोघांनी दोरीचे तुकडे करून दोन गळफास झाडाला बांधले होते. एकाच वेळी दोघेही आत्महत्या करणार होते. पण ते नियतील मान्य नव्हते. यामुळे गळफास लावून घेतल्यावर पत्नीची दोरी तुटली आणि ती वाचली तर मान सिंह यांचा मृत्यू झाला आहे. 

पतीचा मृत्यू पाहून घाबरलेली संता देवी काही अंतरावर असलेल्या आपल्या घराकडे जात होती, तेवढ्यात तिला दोन पोलीस बाईकवरून जात असल्याचे दिसले. तिने त्यांच्याकडे मदत मागितली. तिच्या गळ्याला तुटलेला गळफास तसाच होता. पोलिसांना काय प्रकार घडला ते समजून आला. त्यांनी लगेचच शेताकडे धाव घेतली. मान सिंह यांना खाली उतरविले. परंतू तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

अछनेराचे पोलीस अधिकारी राजीव सिरोही यांच्यानुसार गृह कलहामुळे त्यांनी हे पाऊल उचलले होते. दोघांनाही चार मुले आहेत. त्यांची लग्ने झालेली आहेत. पती पत्नीचे एकमेकांसोबत पटत नव्हते. यामुळे त्यांनी आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या कुटुंबीयांची देखील चौकशी केली जाईल. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरी