शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

पती, पत्नी अन् वो! सुमसान रात्र, पोत्यात सापडला मृतदेह, CCTV नं उलगडलं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 10:15 AM

मुंबईच्या नेहरू नगर परिसरात नाल्यात एक पोतं पडलं होते. सुरुवातीला लोकांचे लक्ष त्याकडे गेले नाही. परंतु त्या पोत्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे लोक त्रस्त झाले.

मुंबई - काही दिवसांपूर्वी मुंबईत एका पोत्यात महिलेचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी ना कोणता पुरावा सापडला, ना साक्षीदार. हे रहस्य उलगडणं पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं होते. परंतु अचानक एक व्यक्ती पोलिसांकडे पोहचतो त्यानंतर या मर्डर मिस्ट्रीचा खुलासा होता जे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. 

५ ऑक्टोबर २०२२ दुपारी १ वाजता - नेहरू नगर

मुंबईच्या नेहरू नगर परिसरात नाल्यात एक पोतं पडलं होते. सुरुवातीला लोकांचे लक्ष त्याकडे गेले नाही. परंतु त्या पोत्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे लोक त्रस्त झाले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोतं पाहिले असता त्यात एखादी वस्तू दाबून बसवली असून त्यानंतर ती बांधण्यात आल्याचं दिसलं. घटनास्थळी पोलिसांनी नाल्यातून हे पोतं बाहेर काढले आणि उघडले असता पोलिसांसह आसपासच्या लोकांना मोठा धक्का बसला. या पोत्यात महिलेचा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत सापडला होता. 

पोलिसांसमोर तपासाचं आव्हानइतकी गर्दी असणाऱ्या या परिसरात मृतदेह पोत्यात भरून नाल्यात फेकला कुणी? गुन्हेगारानं पुरावे मिटवण्यासाठी नेहरू नगरचा नाला का निवडला? गुन्हेगार याच परिसरात राहणारा होता? की दुसऱ्या परिसरातून येऊन त्याने हे पोतं फेकून निघून गेला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधायची होती. पोलिसांनी मृतदेह राजावाडी हॉस्पिटलला पोस्टमोर्टमसाठी पाठवला. त्यानंतर अज्ञाताविरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी ४ पथके बनवली. तपासाला सुरुवात झाली. 

पोलिसांनी खबरी, दुकानदार, रिक्षाचालक यांची चौकशी सुरू केली. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर पोलिसांसमोर स्वत: प्रत्यक्षदर्शी हजर झाला. मृतदेह सापडल्यानंतर तपासाला सुरुवात केली आणि एक रिक्षाचालक पोलिसांसमोर पोहचला. त्याने असा खुलासा केला की पोलिसही हादरले. १ ऑक्टोबरच्या रात्री २-३ दरम्यान हे पोतं नाल्यात फेकलं. रिक्षात बसलेल्या २ महिलांनी हे पोतं नाल्यात फेकले. ज्यारात्री ही घटना घडली तेव्हा त्या माझ्याच रिक्षात बसल्या होत्या. 

कोण होत्या त्या महिला?

या प्रकरणाचा छडा लवकर लागेल असं पोलिसांना वाटलं. परंतु प्रत्यक्षदर्शी उघडपणे समोर बोलण्यास घाबरत होता. जर काही सांगितले तर त्या खूनी महिलांचा शिकार आपण होऊ अशी भीती त्याच्या मनात होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला सुरक्षा देण्याबाबत भरवसा दिला. त्यानंतर त्याने पोलिसांना जे सत्य सांगितले त्याने धक्काच बसला. रात्रीच्या २ वाजता नेहरू नगर बसस्टँडवरून २ महिलांनी रिक्षा भाड्याने घेतली. माहूलजवळ पोहचताच महिलांनी रिक्षा १० मिनिटं थांबवण्यास सांगितली. त्यातील १ महिला घरात गेली. त्यानंतर काहीवेळाने १ पोतं घेऊन ती परतली. महिलांनी पुन्हा नेहरू नगरला नेण्यास सांगितले. त्यानंतर नेहरू नगरच्या नाल्याजवळ उतरून मला जाण्यास सांगितले. त्यानंतर पुढे काय झाले हे माहिती नाही असं त्याने पोलिसांना म्हटलं. 

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात २ महिला पोतं घेऊन जाताना दिसल्या. रिक्षाचालकाकडून पोलिसांनी त्या महिलांची ओळख पटवून घेतली. पोलिसांनी महिलेचा तपास सुरू केला तेव्हा या महिला बहिणी असल्याचं कळालं. मीनल पवार आणि शिल्पा पवार, त्यानंतर दोघींना अटक केली तेव्हा दोघांना खाकीचा हिसका दाखवताच गुन्हा कबूल केला. 

का केली हत्या?

मीनल पवारच्या नवऱ्याचे ईशा मिस्त्री नावाच्या महिलेशी संबंध होते. मीनल आणि पतीचे ईशावरून नेहमी भांडणं व्हायची. परंतु ईशासोबत नाते संपवण्यास पती तयार नव्हता. दोघांची जवळीक वाढतच चालली होती. त्यावरून मीनल आणि तिची बहीण शिल्पा दोघी वैतागल्या होत्या. १ ऑक्टोबरच्या रात्री मीनलचा पती ईशासोबत तिच्या एका डॉली नावाच्या मैत्रिणीच्या घरी गेला होता. डॉली ही मीनलची फॅमिली फ्रेंड होती. डॉलीने मीनलला फोन करून ईशा आणि तिच्या पतीबद्दल सांगितले. मीनलचा पती ईशाला डॉलीच्या घरी सोडून निघून गेला तेव्हा डॉलीने मीनलला कळवले. त्यानंतर शिल्पासोबत मीनलसोबत तिथे पोहचली आणि तिघांनी मिळून त्या रात्री ईशाचा गळा आवळून खून केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"