शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आर्थिक अडचणीमुळे चिंता वाढली, विम्याच्या रकमेसाठी व्यापाऱ्याने स्वत:च्याच हत्येची सुपारी दिली  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 17:43 IST

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या व्यापाऱ्याने विम्याची रक्कम आपल्या नातेवाईकांना मिळावी यासाठी स्वत:च्याच हत्येची सुपारी दिली होती. तसेच ठरलेल्या योजनेनुसार नंतर सुपारी घेणाऱ्या चार जणांनी या व्यक्तीची हत्या केल्याचे, तपासात उघड झाले आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये हत्येचा एक विचित्र गुन्हा समोर आला आहे. येथील कडकड्डूमा परिसरातून बेपत्ता झालेल्या एका व्यावसायिकाच्या हत्येचे गुढ पोलिसांनी उकलले आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनासह एकूण चार जणांना अटक केली आहे. दरम्यान, पोलीस तपासामधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या व्यापाऱ्याने विम्याची रक्कम आपल्या नातेवाईकांना मिळावी यासाठी स्वत:च्याच हत्येची सुपारी दिली होती. तसेच ठरलेल्या योजनेनुसार नंतर सुपारी घेणाऱ्या चार जणांनी या व्यक्तीची हत्या केल्याचे, तपासात उघड झाले आहे.

या व्यापाऱ्याचा मृतदेह १० जून रोजी दिल्लीतील रणहोला भागात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता. तसेच या मृतदेहाचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत होते. १० जून रोजी शानू बन्सल नावाच्या महिलेने आपले पती गौरव बन्सल हे  बेपत्ता असल्याची तक्रार आनंद विहार पोलीस ठाण्यात दिली होती. व्यवसायात नुकसान झाल्याने गौरव बन्सल चिंतेत होते. त्यांनी फेब्रुवारीमध्ये ६ लाखांचे पर्सनल लोक घेतले होते. त्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून त्यांच्या माहितीशिवाय ३.५० लाखांचे पेमेंटसुद्धा झाले होते. त्याची माहिती मयूर विहार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र गौरव यांचे कुणाशीही भांडण नसल्याचे तक्रारीत म्हटले होते.

मात्र तक्रारीपूर्वीच १० जून रोजी त्यांचा मृतदेह रणहोला भागात सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा संशय घेऊन तपास सुरू केला. प्राथमिक तपासामध्ये गौरव यांनी बेपत्ता होण्यापूर्वी एका अल्पवयीनाशी फोनद्वारे संपर्क साधून स्वत:च्याच हत्येची सुपारी दिल्याचे उघड झाले. ठरल्याप्रमाणे गौरव यांनी आपली कार घरीच ठेवली आणि कुठल्यातरी अन्य साधनाने ते रणहोला येथे पोहोचले. वाटेत असताना त्यांनी आरोपींना व्हॉट्स अॅपवरून आपला फोटो पाठवला होता. तिथे गेल्यावर आरोपींनी त्यांना पकडून त्यांचे हातपाय बांधले आणि त्यांना फासावर लटकवले.

आता या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनासह मनोज कुमार यादव, सूरज आणि सुमित कुमार या तिघांना अटक केली आहे. आता पोलीस या हत्येसाठी किती रुपयांना सुपारी देण्यात आली आहे आणि एकूण किती रकमेची सुपारी ठरली आहे. याचा शोध घेत आहेत. तसेच गौरव यांच्यावर किती रुपयांचे कर्ज होते आणि विमा कितीचा होता याचाही शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली