शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

पंतप्रधान आवास योजनेच्या तपासात ईडीची एन्ट्री?; ‘समरथ’ कंपनी ब्लॅकलिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 8:42 AM

राज्यात सहा ठिकाणी घेतली कामे, समरथ कंपनीने काम मिळविण्यासाठी ‘वर्क डन’अंतर्गत मनपाला पुण्यात एक मल्टी स्टोरेज इमारत बांधल्याचे प्रमाणपत्र सादर केले.

औरंगाबाद : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेने ‘समरथ’ कंपनीवर गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचे काम मनपाकडून सुरू आहे. या महाघोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे राज्य शासनामार्फत ताब्यात घेतल्याची माहिती मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 

‘समरथ’ कंपनीने पंतप्रधान आवास योजनेत राज्यात गंगापूर, फुलंब्री, सोयगाव (औरंगाबाद), माजलगाव (बीड), देवगड (सिंधुदुर्ग), राहता (अहमदनगर) येथील कामे घेतली आहेत. काम मिळविण्यासाठी पुण्यातील एक इमारत बांधल्याचा दावा कंपनीने केला. खरोखर कंपनीने इमारत बांधली का? याची शहानिशा मनपा करणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेशी संबंधित घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेत एक समिती नेमली होती. या समितीने केलेल्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यानुसार समरथ कंपनीने एकाच आयपीवरून तीन निविदा आल्याचे समोर आले. चौथी एलोरा कन्स्ट्रक्शन अपात्र ठरविण्यात आली. या प्रकरणात कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. त्यानंतर गुरुवारी गुन्हा दाखल झाला. 

प्रकल्प सल्लागार समितीही त्यांचीच योजनेचा सविस्तर डीपीआर तयार करण्यासाठी प्रकल्प सल्लागार समितीसुद्धा संबंधित कंपनीचीच होती. अहवाल तयार करताना अक्षम्य चुका करण्यात आल्या. जागा ताब्यात नसताना, जागा बघितलेली नसताना डीपीआर तयार केला. ३९ हजार घरे त्या जागांवर बांधणे शक्यच नाही.

म्हणे पुण्यात बांधली उंच इमारत समरथ कंपनीने काम मिळविण्यासाठी ‘वर्क डन’अंतर्गत मनपाला पुण्यात एक मल्टी स्टोरेज इमारत बांधल्याचे प्रमाणपत्र सादर केले. मुळात कंपनीने ही इमारत बांधली का? हे तपासण्यासाठी मनपाने समिती स्थापन केली असून लवकरच समिती पुण्यात जाऊन पाहणी करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.  

एकाच आयपी ॲड्रेसवरून भरल्या निविदा महापालिकेतील पंतप्रधान आवास योजनेच्या विभागप्रमुख उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समरथ कन्स्ट्रक्शन ॲण्ड जे. व्ही., इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आणि जॅग्वार ग्लोबल सर्व्हिसेस या तीन कंपन्यांनी १०३.२११.६१.१८४ या एकाच आयपी ॲड्रेसवरून कंत्राटासाठी निविदा भरल्या. तीन कंपन्यांनी संगनमत केल्यामुळे समरथ कंपनीला कंत्राट मिळाले.

४६ कोटींपैकी भरले फक्त ८८ लाख  औरंगाबाद शहरात ३९ हजार घरे बांधायची होती. कंपनीने दाखल केलेल्या दरानुसार प्रकल्पाची किंमत ४ हजार ६०० कोटी रुपये होते. प्रकल्पाच्या किमतीच्या तुलनेत १ टक्का बॅँक गॅरंटीप्रमाणे ४६ कोटी भरणे अपेक्षित होते. त्यांनी फक्त ८८ लाख रुपये भरले. त्यामुळे मनपाने ‘समरथ’ कंपनीसोबत ॲग्रीमेंट केले नाही.