शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
2
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
3
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
4
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
5
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
8
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
9
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
10
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
11
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
12
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
13
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
14
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
15
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
16
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
17
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
18
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
19
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
20
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू

भयंकर! 70 हजारांसाठी पोलीस रोज घरी यायचे; लेकाचा त्रास पाहून आईने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 2:17 PM

महिलेच्या मुलावर चोरीचा आरोप केल्यानंतर पोलीस त्यांच्यावर 70 हजार रुपये परत करण्यासाठी दबाव टाकत होते.

उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील एका गावात पोलिसांच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या मुलावर चोरीचा आरोप केल्यानंतर पोलीस त्यांच्यावर 70 हजार रुपये परत करण्यासाठी दबाव टाकत होते. तीन दिवसांत 70 हजार रुपये परत करण्यासाठी पोलिसांनी दबाव आणल्याचा आरोप मुलीने केला आहे.

गदागंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने जाळून घेऊन आत्महत्या केली. गावामध्ये चोरीचा संशय महिलेच्या मुलावर घेतल्यानंतर पोलीस त्याच्यावर एफआयआर किंवा तपास न करता 70 हजार रुपये परत करण्यासाठी दबाव टाकत होते. पोलिसांनी तीन दिवसांत 70 हजार परत करण्यास भाग पाडल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या मुलीने केला आहे. यामुळे दुखावलेल्या आईने आत्महत्या केल्याचंही म्हटलं आहे.

लखनच्या घरात पाच दिवसांपूर्वी चोरी झाली होती. गावातील रहिवासी लखन याने त्याच ठिकाणी राहणाऱ्या शिवकुमार मौर्य यांच्या अल्पवयीन मुलावर आरोप केले होते. याप्रकरणी एफआयआर न नोंदवता पैसे परत करण्यासाठी पोलीस शिवकुमार मौर्य यांच्यावर दबाव आणत होते. पोलिसांच्या त्रासामुळे आणि समाजाच्या भीतीने दुखावलेल्या शिवकुमार मौर्य यांच्या पत्नी शांती देवी यांनी स्वत:वर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेतल्याचा आरोप आहे.

गंभीर भाजलेल्या शांतीदेवी यांना रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घरात पोलीस रोज येत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे आईला खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळेच तिने हे टोकाचं पाऊल उचलले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून, पुढील कारवाई सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी