शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

हाण की बडीव! टीव्ही डिबेटमध्ये स्वामी प्रसाद मौर्य आणि राजू दास यांच्यात हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 7:37 AM

स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा राजू दास करत आहेत. दुसरीकडे मौर्य यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

सपा नेता स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसवर केलेल्या वक्तव्यांमुळे सध्या वाद सुरु आहे. यासाठी ते एका टीव्ही कार्यक्रमात आले होते. तेथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या राजू दास परमहंस यांच्यासोबत वाक् युद्ध सुरु झाले, ते पार मारहाणीपर्यंत गेल्याचा प्रकार घडला आहे. 

वादादरम्यान स्वामी प्रसाद मौर्य यांनी प्रभू रामाचा अपमान केल्याने राजू दास परमहंस संतापले. या कारणावरून दोन्ही बाजूंनी जोरदार वादावादी सुरू झाली. काही वेळातच वातावरण अधिक तापले आणि हाणामारीही झाली. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा राजू दास करत आहेत. यामुळे ते मौर्य यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. 

दुसरीकडे मौर्य यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ताज हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमातून बाहेर पडताना हनुमानगढी, अयोध्येचे महंत राजू दास आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्यावर तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. करोडो लोक रामचरित मानस वाचत नाहीत, हा सगळा मूर्खपणा आहे. तुलसीदासांनी आपल्या आनंदासाठी हे लिहिले होते, असे मौर्य म्हणाले होते. रामचरित मानसमधील आक्षेपार्ह भाग वगळावा किंवा पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. ब्राह्मण हा लंपट, दुष्ट, अशिक्षित आणि अशिक्षित असू शकतो, पण जर तो ब्राह्मण असेल तर तो पूज्य आहे असे म्हटले जाते. परंतु शूद्र कितीही विद्वान असला तरी त्याचा आदर करू नका हा धर्म आहे का? असा सवाल केला होता. यावरून मौर्य यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टी