शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

जळगावातील सकट खून खटल्यात एकाच कुटुंबातील पाच जणांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 14:55 IST

Murder Case : याबाबत अधिक माहिती अशी की,  १२ जुलै रोजी २०१७ रोजी रात्री अकरा वाजता किरकोळ कारणावरुन सकट व बावरी कुटुंबात राजीव गांधी नगरात वाद झाला होता.

ठळक मुद्देन्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. यात सरकारतर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली. यावेळी न्यायालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जळगाव : राजीव गांधी नगरातील राहूल प्रल्हाद सकट (२५) याच्या खून प्रकरणात सत्यासिंग मायासिंग बावरी, रवीसिंग मायासिंग बावरी (२७), मलींगसिंग मायासिंग बावरी (२५), मालाबाई मायासिंग बावरी (६३) व कालीबाई सत्यासिंग बावरी (४३) सर्व रा.राजीव गांधी नगर या पाच जणांना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयानेजन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्या.आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला. 

याबाबत अधिक माहिती अशी की,  १२ जुलै रोजी २०१७ रोजी रात्री अकरा वाजता किरकोळ कारणावरुन सकट व बावरी कुटुंबात राजीव गांधी नगरात वाद झाला होता. यात राहूल याच्या पोटात चॉपर खुपसून गंभीर जखमी केले होते. मूत्रपिंडालाही इजा झाली होती. मुंबईला नेत असतानाच राहूल याचा नाशिकजवळ मृत्यू झाला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात बावरी कुटुंबियाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. यातील सत्यासिंग, मलींगसिंग व रवीसिंग गुन्हा घडल्यापासून कारागृहात आहेत तर मालाबाई व कालीबाई या दोघं जामीनावर होत्या. रामानंद नगर पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक बापू रोहोम,उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे,उपनिरीक्षक राजेश घोळवे, सहायक फौजदार गोपाळ चौधरी, प्रदीप चौधरी व शरद पाटील या गुन्ह्याचा तपास करुन सर्व आरोपींना अटक केली होती. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. यात सरकारतर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली. यावेळी न्यायालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Life Imprisonmentजन्मठेपMurderखूनCourtन्यायालयJalgaonजळगावFamilyपरिवार