शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी गड राखला, तर दोन अधिकारी झाले पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:35 IST

मुंबईचे माजी आयुक्त व केंद्रीय मंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांना मात्र आपला गड राखण्यात यश आले आहे.

ठळक मुद्देमाजी अप्पर महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांचेही लोकसभाप्रवेश करण्याचे स्वप्न भंगले. अरुप पटनायक यांनीही खासदार होण्यासाठी निकराची झुंज दिली. सामाजिक कार्याची आवड असलेल्या लक्ष्मीनारायण यांनी आंध्र प्रदेशमधील जनसेवा पार्टीच्या वतीने विशाखापट्टणम येथून निवडणुकीच्या रिंगणात होते.

जमीर काझी मुंबई - महाराष्ट्र पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात नशीब अजमावलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरूप पटनायक व माजी अप्पर महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना पराभवाची चव चाखावयास मिळाली आहे. तर मुंबईचे माजी आयुक्त व केंद्रीय मंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांना मात्र आपला गड राखण्यात यश आले आहे.राज्य पोलीस दलात कर्तृत्वाची छाप पाडलेले हे तीन अधिकारी आपापल्या राज्यातील स्वत:च्या मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षाच्या तिकिटावर लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. यापैकी सत्यपाल सिंह यांना नरेंद्र मोदी यांच्या लाटेच्या जोरामुळे अत्यल्प मतांनी का होईना दुसऱ्यांदा लोकसभेत प्रवेश करता आला आहे.मावळत्या लोकसभेत केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषविलेले सत्यपाल सिंह हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि १९८० च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी सेवानिवृत्तीला काही महिन्यांचा अवधी असताना त्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. उत्तर प्रदेशातील बागपत या मतदारसंघातून निवडणूक लढविताना त्यांनी सपाचे गुलाम महमद व राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख अजित सिंह यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. त्या वेळी तिसºया स्थानावर राहिलेल्या अजित सिंह यांचे पुत्र जयंत चौधरी यांच्याशी या वेळी त्यांची अटीतटीची लढत झाली. सपाने पाठिंबा दिलेले चौधरी सुरुवातीच्या काही फेऱ्यांत आघाडीवर होते. मात्र अखेर सत्यपाल २३,५०२ मतांनी विजयी झाले. त्यांना ५,२५,७८९ इतकी तर चौधरी यांना ५,०२,२८७ इतकी मते मिळाली.सत्यपाल सिंह यांनी ज्यांच्याकडून मुंबईच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्या अरुप पटनायक यांनीही खासदार होण्यासाठी निकराची झुंज दिली. मात्र त्यांना सत्यपाल सिह यांच्यासारखी किमया करता आली नाही. १९७९च्या बॅचचे आयपीएस असलेल्या पटनायक यांनी ३ महिन्यांपूर्वी ओडीसातील बिजू जनता दलात प्रवेश केला होता. त्यांनी भुवनेश्वरमधून निवडणूक लढविताना निवृत्त आयएएस अधिकारी भाजपच्या अपराजिता सारंगी यांच्याकडून २३,८३९ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. दोघांना अनुक्रमे ४,६३,१५२ व ४,८६,९७१ इतकी मते पडली.तर माजी अप्पर महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांचेही लोकसभाप्रवेश करण्याचे स्वप्न भंगले. १९९०च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले लक्ष्मीनारायण यांनी दीड वर्षापूर्वी आठ वर्षांची सेवा बाकी असताना बदल्यातील ‘राजकारणाला’ कंटाळून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. सामाजिक कार्याची आवड असलेल्या लक्ष्मीनारायण यांनी आंध्र प्रदेशमधील जनसेवा पार्टीच्या वतीने विशाखापट्टणम येथून निवडणुकीच्या रिंगणात होते. एकूण २३.७ टक्के म्हणजे २,८८,८७४ मते मिळवीत तिसऱ्या स्थानी फेकले गेले. युवाजन श्रमिक ऋतू कॉँग्रेस पार्टीच्या एम.व्ही.व्ही. सत्यनारायण यांनी चुरशीच्या लढतीत तेलगू देशमच्या भारत भातुकुमली यांचा अवघ्या ४ हजार ४१४ मतांनी पराभव केला. लक्ष्मीनारायण यांना मिळालेली मते त्यांना फायद्याची ठरली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Policeपोलिस