शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 13:50 IST

वजीराबाद ठाण्यात गुन्हा दाखल : नामांकित कंपन्यांच्या बियाणांची उगवण क्षमता २५ टक्केच

ठळक मुद्देसदर प्रकरण लोकमतने लावून धरल्यानंतर इंदौर येथील एका सोयाबीन कंपनीवर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  संदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद ठाण्यात सदर कंपनी विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीनिवास भोसले

नांदेड - बोगस सोयाबीन विक्री केल्यामुळे शेकडो हेक्टरवर उगवून होऊ न शकल्याने करोडो रुपयांचे नुकसान शेतकर्‍यांना सहन करावे लागले. सदर प्रकरण लोकमतने लावून धरल्यानंतर इंदौर येथील एका सोयाबीन कंपनीवर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकर्‍यांनी मृगनक्षत्रात खरिपाची पेरणी केली. मात्र ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी करून लागवड केली. अशा अनेक शेतकर्‍यांचे बियाणे उगवले नाही. अशा शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बोगस बियाणे बाजारात आणून विक्री करणारे व्यापारी व संबंधित कंपनीवर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांसह विविध संघटनांनी केली होती. दरम्यान, सदर प्रकरण 'लोकमत'ने लावून धरल्यानंतर उच्च न्यायालयाने सदर कंपन्या आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच स्वतःहून न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. दरम्यान नांदेडात दाखल करण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच गुन्हा असल्याचे बोलले जात आहे. सोयाबीन बियाणे उत्पादन करणाऱ्या या इंदौरमधील नामांकित कंपनीचे बियाणे 25% उगवण क्षमता असलेले बीज परीक्षण प्रयोगशाळा परभणी यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. बियाणांची उगवण क्षमता 70टक्के असणे गरजेचे असते. दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद ठाण्यात सदर कंपनी विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत उच्च न्यायालयाने दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेचाही संदर्भ देण्यात आला आहे.या प्रकरणाची दखल घेत कृषी सहनियंत्रण समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तक्रारी प्राप्त कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार वजिराबाद पोलिस ठाण्यात इंदौर येथील इगल सीड अ‍ॅण्ड बायोटेक लिमिटेड कंपनीवर गुन्हा करण्यात आला आहे. एखाद्या कंपनीवर बोगस बियाणे विक्री प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची या वर्षांमधील पहिलीच कारवाई आहे. दरम्यान जिल्ह्यातील बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारींची संख्या चार हजारावर पोहोचली आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNandedनांदेड