शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वाईतील चार जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

By दत्ता यादव | Updated: March 11, 2024 20:25 IST

सातारा : वाई पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या चार जणांच्या टोळीला पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातून दोन ...

सातारा : वाई पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या चार जणांच्या टोळीला पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले. अक्षय गोरख माळी (वय २१), सनी उर्फ राहुल सुरेश जाधव (२५), सारंग ज्ञानेश्वर माने (२४), वसंत ताराचंद घाडगे (१९, सर्व रा. गुरेबाजार झोपडपट्टी, वाई), अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरील चौघांवर गर्दी मारामारी करून खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी, चोरी करणे, शिवीगाळ, दमदाटी करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

या गुन्ह्यांत चौघांनाही बऱ्याचवेळा अटकही झाली. मात्र, जामिनावर कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांच्या हातून गुन्हे घडत होते. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे वाई तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. या टोळीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जात होती. त्यामुळे वाई पोलिस ठाण्यातील प्रभारी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी या चाैघांचा हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठविला.

या प्रस्तावावर सुनावणी होऊन अधीक्षक शेख यांनी चौघांनाही सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले. हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस उपनिरीक्षक तानाजी माने, हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा चव्हाण यांनी योग्य पुरावे सादर केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी