शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अपहरण करून ट्रेनिंग देतात, पैशांचे टार्गेट फिक्स; भिकाऱ्यांच्या नेटवर्कचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 14:34 IST

काही दिवसांनी हा दिव्यांग मुलगा कटिहारच्या रस्त्यांवर भीक मागत असल्याचं कुटुंबाला कळालं.

कटिहार - मुंबई असो वा दिल्ली देशातील अनेक शहरांमध्ये तुम्हाला भिकारी लोकांकडे भीक मागताना पाहायला मिळतील. मुंबईत तर भिकाऱ्यांचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. ज्यात हजारोंच्या संख्येने भिकारी जोडले आहेत. भीक मागण्याच्या व्यवसाय वर्षाकाठी कोट्यवधीच्या घरात जातो. यात दिव्यांग मुले आणि मोठ्या प्रमाणात वृद्धांचा समावेश असतो. मुंबईत भिकाऱ्यांचे रॅकेट चालते. त्याचप्रमाणे आता बिहारमध्येही हे उघड झाले आहे.

रमजानच्या काळात मोठ्या संख्येने भाड्याने भिकारी बनवण्याचं रॅकेट उभं केले जात आहे. त्यांना भीक मागण्याचं काम दिले जात आहे. यातून मिळणारा पैशामधील मोठा हिस्सा माफियांपर्यंत पोहचवला जातो. दिव्यांगांकडून मशिदीसमोर जबरदस्तीनं भीक मागण्यास बसवल्याचं एक प्रकरण उघड झाले आहे. कटिहारच्या मनिहारी येथून दीड महिन्यापूर्वी गुलशन नावाचा दिव्यांग मुलगा बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी त्याला खूप शोधलं परंतु तो सापडला नाही. त्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यात रिपोर्ट नोंदवण्यात आला.

काही दिवसांनी हा दिव्यांग मुलगा कटिहारच्या रस्त्यांवर भीक मागत असल्याचं कुटुंबाला कळालं. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देत कटिहार गाठलं. त्यानंतर गुलशनच्या कुटुंबाने जे सांगितले ते धक्कादायक होते. गुलशननं त्याच्या कुटुंबाला सांगितले की, मनिहारीतून एका व्यक्तीने मला फसवून घेऊन गेला. या व्यक्तीचं भिकाऱ्यांशी नेटवर्क होते. तो स्वत: भीक मागतो. सुरुवातीला मला भीक मागण्याचं ट्रेनिंग दिले गेले. त्यानंतर दिवसाला १ हजार ते १५०० रुपये भीक जमा करण्यास सांगितले. हा पैसा ते जमा करतात त्यातील मोठा हिस्सा सिडिंकेटमध्ये जातो. त्यात अनेकजण सहभागी असल्याचं मुलाने सांगितले.

ज्या मुलांचं अपहरण करून भीक मागण्यासाठी लावण्यात येत होते त्यातील बहुतांश अल्पवयीन होते. या रॅकेटमागे काही मोठ्या लोकांचाही हात आहे. जे दिवसाचे कलेक्शन आणि पैशांचा हिशोब ठेवतात. गुलशनने हाजीपूर परिसराचा उल्लेख करत त्याठिकाणी बळजबरीने मुले आणि वृद्धांना भीक मागण्यासाठी अपहरण करून ठेवल्याचं सांगितले. त्याचठिकाणी त्याला ट्रेनिंग दिली गेली. मात्र गुलशनच्या खुलाशामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी अशा लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. लवकरच आरोपींना अटक करू असं आश्वासन पोलिसांनी दिले आहे.