शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

लग्नाच्या दिवशीच दुसऱ्या तरूणीला घेऊन पळाला नवरदेव, नवरीने पोलिसांकडे केली न्यायाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 14:19 IST

Groom run away with other girl on marriage day : हमीरपूर जिल्ह्यातील राठ भागातील पठाणपुरा मुहाल येथे राहणाऱ्या विद्या देवी यांचा पती शिवकुमार यांचं २० वर्षांपूर्वीच निधन झालं होतं.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हमीरपूर जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेव पळून गेल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या दिवशी नवरदेव दुसऱ्याच तरूणीला घेऊन (Groom run away with other girl on marriage day) पळाला. ज्यामुळे नवरीच्या घरी एकच गोंधळ झाला. त्यानंतर नवरदेवाकडील लोकांनी फोन करून ते वरात आणत नसल्याचं सांगितलं. यासंबंधी तक्रार देण्यासाठी नवरी आणि तिची आई पोलीस स्टेशनमध्ये गेल्या.

हमीरपूर जिल्ह्यातील राठ भागातील पठाणपुरा मुहाल येथे राहणाऱ्या विद्या देवी यांचा पती शिवकुमार यांचं २० वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. त्यांनी आपल्या दोन मुलींना वाढवण्यासाठी मोलमजुरी केली. मोठी मुलगी उषाचं लग्न चार वर्षाआधीच केलं होतं. तर लहान मुलगी २० वर्षीय अनीताचं लग्न कानपूर नगरच्या दर्शनपुरवामध्ये ठरलं होतं.

अनीताचं लग्न दर्शनपुरवा येथील राहुल वर्मासोबत जुळवण्यात आलं होतं. १० मे रोजी वरात येणार होती. ज्यासाठी दोन्ही घरात सर्व तयारी पूर्ण झाली होती. लग्नात सहभागी होण्यासाठी नातेवाईकही आले होते. रविवारी घरातील मंडपात रितीरिवाज होणार  होते. हळदीच्या कार्यक्रमात संगीत वाजत होतं. तेव्हाच नवरदेवाच्या नातेवाईकांनी फोन करून वरात आणणार नसल्याचं सांगितलं.

ऐनवेळी वरात आणण्यास नकार दिल्याने सगळे लोक हैराण झाले. नवरीची आई विद्या देवी यांनी सांगितलं की, नवरदेवाचा भाऊ अनिलने फोन माहिती दिली की, राहुल दुसऱ्या मुलीसोबत पळून गेला. त्यामुळे ते वरात आणू शकत नाही आणि त्याने फोन बंद केला.

मुलीला घेऊन आई पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्यांनी तक्रार दाखल केली. दोघींनी तक्रार दाखल करत पोलिसांकडे न्यायाची मागणी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तक्रार दाखल करून घेतली आहे आणि लवकरच कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी