शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पत्नीचा खून करून पतीचीही आत्महत्या, ठाण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 06:36 IST

shocking incident in Thane : वागळे इस्टेट येथील एका पेस्ट कंट्रोल करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा आकाश आणि अश्विनी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. घरात तिच्या सासू, सासऱ्यांबरोबर होणाऱ्या भांडणांमुळे तिने वेगळे घर घेण्याची मागणी आकाशकडे केली होती.

ठाणे : सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहण्याची मागणी करणारी पत्नी अश्विनी (वय १८) हिचा निर्घृण खून करून आकाश समुखराव (२९, रा. वागळे इस्टेट, ठाणे) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. १७) पहाटेच्या सुमारास घडली.वागळे इस्टेट येथील एका पेस्ट कंट्रोल करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा आकाश आणि अश्विनी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. घरात तिच्या सासू, सासऱ्यांबरोबर होणाऱ्या भांडणांमुळे तिने वेगळे घर घेण्याची मागणी आकाशकडे केली होती. यातूनच या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. सध्या ते इंदिरानगर येथील घरात एकत्र कुटुंब पद्धतीने वास्तव्य करीत होते. मात्र, रात्री झोपण्यासाठी ते जवळच असलेल्या रूपादेवी पाडा क्रमांक दोन येथील रणजित शिरसाठ या नातेवाइकाच्या घरी जात होते. १६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता ते या घरी झोपण्यासाठी गेले. मात्र तिथे पुन्हा त्यांचा याच मुद्द्यावरून वाद झाला. दुसऱ्या दिवशी बुधवारी रोजी सकाळी १० वाजले तरी या घरातून काहीच आवाज आला नाही. त्यावेळी त्यांच्या नातेवाइकांनी आणि शेजारच्यांनी या घराच्या मागील बाजूने आत डोकावले. त्यावेळी आकाश एका साडीला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळला. त्यावेळी या घराच्या छताचा पत्रा उचकटून स्थानिकांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी त्याची पत्नी अश्विनी हीदेखील रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. जवळच लोखंडी हातोडाही होता. तिच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार केल्याचे आढळले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त विनय राठोड, सहायक पोलीस आयुक्त जयंत बजबळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. 

तपास सुरूश्रीनगर पोलिसांनी आकाशविरुद्ध पत्नीचा खून आणि स्वत: आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे सहायक पोलीस आयुक्त बजबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी