शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
2
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
3
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
4
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
5
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
6
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
7
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
8
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
9
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
10
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
11
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
12
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
13
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
14
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
15
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
16
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
17
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
18
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!
19
IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच
20
IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव

महाराष्ट्रातील मुलीची बंगळुरूत हत्या; २४ तासांत पोलिसांनी प्रोजेक्ट मॅनेजरला कसं पकडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:42 IST

डीसीपी सारा फातिमा यांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला. बंगळुरू पोलीस संध्याकाळच्या विमानाने पुण्यात पोहचली. 

बंगळुरू - कर्नाटकातील बंगळुरू येथे महाराष्ट्रातील मुलीच्या हत्येने खळबळ माजली आहे. याठिकाणी ३६ वर्षीय आरोपी पतीने ३२ वर्षीय पत्नीची हत्या केली. या हत्येनंतर आरोपीने तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवला आणि घरातून पळ काढला. या आरोपीला पुण्यात अटक करण्यात आली आहे. मयत पत्नीचे नाव गौरी सांबेकर असं आहे. ती मास मिडिया ग्रॅज्युएट असून ती नोकरीच्या शोधात होती. या आरोपीचं नाव राकेश खेडेकर असं आहे. तो एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आहे. अलीकडेच हे दोघं बंगळुरूतील दोडुकम्मनहल्ली येथे भाड्याच्या घरात राहत होते. 

मुंबईतून आले होते बंगळुरूला...

माहितीनुसार, हे जोडपे मुंबईतून बंगळुरूला आले होते. ते शहरात कधी शिफ्ट झाले हे अद्याप समोर आले नाही. पत्नी गौरीची हत्या करून पती राकेश पळाला होता. बंगळुरूहून तो कारने पुण्याला पोहचला तेव्हा त्याला अटक करण्यात आली. आरोपी पतीला बंगळुरूला परत नेले जात आहे. राकेशने गुरूवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास त्याच्या घर मालकाला फोन केला होता. काल रात्री मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे आणि शहर सोडून चाललोय असं त्याने घर मालकाला सांगितले. त्याशिवाय पोलिसांना हे सांगा आणि तिच्या घरच्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी कळवा असंही आरोपीने घरमालकाला म्हटलं.

घर मालकाला बसला धक्का

आरोपी राकेशचं फोनवरचं बोलणं ऐकून घर मालकाला धक्का बसला. त्याने तातडीने घर गाठलं तेव्हा तिथे दरवाजा बंद असल्याचं दिसले. त्याने ११२ या हेल्पलाईनवर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हुलिमावु पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा गौरीचा मृतदेह एका ट्रॉली बॅगमध्ये ठेवल्याचं दिसून आले. त्यानंतर तातडीने पोलिसांनी राकेशचा मोबाईल ट्रेस केला. डीसीपी सारा फातिमा यांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला. बंगळुरू पोलीस संध्याकाळच्या विमानाने पुण्यात पोहचली. 

रात्री ९.३० च्या सुमारास महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने बंगळुरू पोलिसांनी राकेशला अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या हत्येमागचं कारण शोधलं जात आहे. विशेष म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर राकेशने गौरीच्या आई वडिलांना फोन करून माहिती दिली. राकेश आणि गौरी यांचं २ वर्षापूर्वी लग्न झालं असून दोघेही वर्क फ्रॉम होम करायचे. लग्नानंतर काही काळातच वारंवार या दोघांमध्ये भांडणे व्हायची. अखेर या दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि राकेशने गौरीला कायमचा संपवला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी