शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 14:33 IST

स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले त्यानंतर याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. पथकानं विहिरीतून ३ युवकांचे मृतदेह बाहेर काढले.

एका कोंबड्याला पकडण्यासाठी घरातील छोट्या मुलानं विहिरीत उडी मारली. खूप वेळ तो बाहेर न पडल्याने मोठ्या भावानेही पाण्यात उडी घेतली. परंतु ते दोघेही परत न आल्याने आणखी एका स्थानिक युवकाने विहिरीत उडी मारली. हे तिघेही पुन्हा बाहेर आले नाहीत. त्यामुळे स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे एका कोंबड्यामुळे ३ जणांचा जीव गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 

आसामच्या कछार जिल्ह्यात लखीमपूर इथं ही घटना घडली. याठिकाणी एका कुटुंबातील कोंबडा अचानक विहिरीत पडला. त्याला वाचवण्यासाठी कुटुंबातील दोन भाऊ मनजीत देब आणि प्रोसेनजीत देब हे दोघे विहिरीत उतरले. मात्र खूप वेळ दोघं वर न आल्याने अमित सेन नावाचा स्थानिक युवकानेही विहिरीत उडी मारली. मात्र हे तिघेही पुन्हा वर आले नाहीत तेव्हा स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. 

स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले त्यानंतर याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. पथकानं विहिरीतून ३ युवकांचे मृतदेह बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीत विषारी वायूमुळे या तिघांचे गुदमरून मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. 

दरम्यान, ही घटना दुर्दैवी असून विहिरीत पडलेल्या भावाला वाचण्यासाठी २ जणांनी विहिरीत उडी घेतली. परंतु तिघेही  पुन्हा परतले नाहीत. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले अशी माहिती पोलीस अधीक्षक नुमल महत्ता यांनी दिले.