शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
3
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
4
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
5
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
6
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
7
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
8
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
9
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
10
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
11
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
12
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
13
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
14
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
15
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
16
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
17
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
18
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
19
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
20
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..

कोरोना काळात सर्वसामान्यांचे दिवाळं तर चोरट्यांची दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 4:23 PM

Robbery Case :दोन वर्षात ५५.४४ कोटीच्या मुद्देमालावर डल्ला

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : कोरोनामुळे नोकरी, उद्योगांवर कोसळलेल्या कुऱ्हाडीमुळे सर्वसामान्यांचे दिवाळे निघाले असतानाच, चोरट्यांची मात्र चांदी झाल्याचे समोर आले आहे. अवघ्या कोरोना काळातल्या दोन वर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून ५५ कोटी ४४ लाखाच्या मुद्देमालावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. त्यापैकी १९ कोटी ३५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, उर्वरित ३६ कोटी ८ लाखाचा मुद्देमाल चोरटयांनी फस्त केला आहे.

नवी मुंबईत वाढती गुन्हेगारी पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण करत आहे. शहरात चोरी, घरफोडी, जबरी लूट, सोनसाखळी चोरी अशा घटना दिवसेंदिवस घडत आहेत. त्यामध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा ऐवज चोरटे पळवत आहेत. त्यात नवी मुंबईतल्या गुन्हेगारांसह शहराबाहेरील टोळ्या सक्रिय आहेत. अनेकदा अशा टोळ्यांच्या मुक्ष्या आवळून पोलीस गुन्हा उघड देखील करतात. मात्र गुन्हेगार हाती लागूनही त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल पुन्हा हस्तगत करण्यात पुरेशे यश मिळत नाही. यामुळे गुन्हेगारांचे शिकार बनलेल्या सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच पडत असते. त्यातच २०२० मध्ये देशात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. काहींच्या उद्योग व्यवसायाला कायमचे टाळे लागले, तर काहींना नोकरी गमवावी लागली. यामुळे आलेल्या नैराश्यातून काहींनी आत्महत्या केल्याच्या देखील घटना नवी मुंबईसह पनवेल परिसरात घडल्या आहेत.

मात्र कोरोनामुळे सर्वसामान्य जरी होरपळला असला तरी, चोरट्यांची मात्र या कालावधीत देखील चांदी झाल्याचे दिसून येत आहे. २०२० मध्ये लॉकडाऊन असतानाही वेगवेगळ्या गुन्ह्यात नवी मुंबईसह पनवेल, उरण मधून तब्बल २५ कोटी १८ लाखाचा मुद्देमाल चोरटयांनी पळवला होता. त्यानंतर २०२१ मध्ये सर्वसामान्यांची गाडी रुळावर येत असतानाच चोरटयांनी देखील गुन्ह्यांचा सपाटा लावला होता. त्यामुळे गतवर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून ३० कोटी २५ लाखाच्या ऐवजावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. 

२०१९ मध्ये चोरटयांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून २२६० गुन्ह्यात तब्बल २८ कोटी ९२ लाखाचा मुद्देमाल चोरटयांनी लुटला होता. मात्र कोरोनामुळे २०२० मध्ये देखील चोरट्यांकडून हातसफाई सुरु असतानाच २०२१ मध्ये देखील २२६८ गुन्ह्यात तब्बल ३० कोटी २५ लाखाचा ऐवज लुटला आहे.

मुद्देमालाशी संबंधित गुन्ह्यांची उकल करून त्यामधील ऐवज हस्तगत करण्यात पोलीस अपयशी ठरताना दिसत आहेत. गुन्हा उघड होण्यास विलंब झाल्यास, त्या कालावधीत गुन्हेगारांकडून त्या मुद्देमालाची विल्हेवाट लावली जाते. परिणामी त्या गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागत नाही. यामुळेच २०१९ मध्ये ३१.८७ टक्के, २०२० मध्ये ४२.४४ टक्के तर २०२१ मध्ये केवळ २८.६५ टक्के मुद्देमाल हस्तगत झाला आहे.

मालमत्तेचे गुन्हे     -             २०२१             २०२०               २०१९चोरीला गेला मुद्देमाल - ३०,२५,६३,००६ - २५,१८,३९,२७८ - २८,९२,६२,४३५हस्तगत केला मुद्देमाल - ८,६६,७७,०६१  - १०,६९,२१,२५१ - ९,२२,०१,७३२चोरटयांनी फस्त केला - २१,५८,८५,९४५ - १४,४९,१८,०२७ - १९,७०,६०,७०३

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसRobberyचोरीcorona virusकोरोना वायरस बातम्या