शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
3
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
4
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
5
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
6
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
7
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
8
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
9
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
10
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
11
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
12
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
13
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
14
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
15
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
16
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
17
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
18
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
19
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
20
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..

बागेतून तब्बल १५ हजार लिंबू चोरीला; शेतकऱ्यांनी ५० जण ठेवले राखणीला, अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 3:38 PM

शेतकऱ्यांनी चोरी रोखण्यासाठी रोजंदारीवर ठेवले राखणदार; दिवसाचा खर्च २२ हजार

आंब्याचा हंगाम सुरू असताना भाव मात्र लिंबू खाऊन जात आहे. सध्या देशभरात लिंबांच्या दराची सर्वाधिक चर्चा आहे.  उन्हाळ्याच्या दिवसात घाम आल्यावर अनेकजण लिंबू सरबत पिणं पसंत करतात. मात्र सध्या लिंबूचा दर ऐकून अनेकांना घाम फुटला आहे. लिंबाचे दर इतके वाढलेत की आता त्याची चोरी होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशातील कानपुरात अशीच एक घटना घडली आहे. बिठूर येथील बागेतून १५ हजार लिंबू चोरीला गेले आहेत.

बिठूर येथे गंगेच्या किनारी भागात लिंबाचं उत्पादन घेतलं जातं. लिंबाचे दर वाढल्यापासून चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे आता लिंबांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांनी रखवालदार तैनात केले आहेत. लिंबाच्या बागेची रखवाली करण्याचं काम ५० जणांवर सोपवण्यात आलं आहे. या रखवालदारांना ४५० मुजरी दिली जाते. त्यामुळे रखवालदारांवर दररोज होणारा खर्च २२ हजार ५०० रुपयांच्या घरात जातो. 

याआधी शाहजहापूर आणि बरेलीत लिंबांची चोरी झाल्याच्या घटना घडल्या. बरेलीच्या डेलापीर मंडईतून गेल्या रविवारी रात्री ५० किलो लिंबू चोरीला गेले. तर शाहजहापुरातील बजरिया भाजी मंडईतून ६० किलो लिंबू चोरट्यांनी लंपास केले. यासोबतच चोरट्यांनी ४० किलो कांदे आणि ३८ किलो लसूणदेखील लांबवला.

बिठूर पोलीस ठाण्यात बुधवारी अभिषेक निषाद यांनी लिंबू चोरीबद्दल एफआयआर दाखल केला. गेल्या ३ दिवसांत १ एकरमधून जवळपास १५ हजार लिंबू चोरीला गेल्याची तक्रारी अभिषेक यांनी नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला. तर अभिषेक यांनी बागेतच मुक्काम ठोकला आहे. लिंबू पूर्ण पिकेपर्यंत ते बागेतच राहणार आहेत.