शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"मम्मी, मला माफ कर, मी खूप..."; अतुल सुभाषसारखंच तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:20 IST

जयपूर येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. 

राजस्थानच्या जयपूर येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बंगळुरूमधील अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणासारखीच घटना घडली आहे. जयपूरच्या सचिवालयातील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका इंजिनिअरने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १४ डिसेंबर रोजी घडली होती, मात्र आता उघडकीस आली आहे. २८ वर्षीय शुभम शर्मा याने महेश नगर सैनी कॉलनी येथील राहत्या घरी आत्महत्या केली आणि सुसाईड नोटही लिहिली.

शुभम शर्माच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने आईची माफी मागितली आणि लिहिलं, "मम्मी, मला माफ कर. मी खूप त्रस्त आहे. मी सर्वकाही नीट करू शकत नाही." दुसरीकडे, शुभमच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्याची पत्नी आणि सासरचे लोक त्याचा सतत छळ करत होते. सासरच्यांनी त्याला मारहाण करण्याची आणि त्याच्याकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.

शुभमच्या कुटुंबीयांचा मोठा दावा आहे की, त्याला भीती होती की, सासरचे लोक आपल्यासमोर अतुल सुभाषसारखी परिस्थिती निर्माण करू शकतात. या भीतीने त्याने मृत्यूला कवटाळलं. मात्र, या आरोपांची चौकशी सुरू आहे. तपासानंतरच चित्र स्पष्ट होईल.

शुभम हा पाच बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ असून तो मूळचा करौली येथील रहिवासी होता. सध्या तो जयपूरच्या महेश नगर पोलीस स्टेशन परिसरात राहत होता. या आत्महत्या प्रकरणाचा तपास आधीच सुरू होता, मात्र आता या सुसाईड नोटमुळे तपासात नवं वळण आलं आहे. पोलीस शुभम शर्माच्या कुटुंबीयांची चौकशी करणार असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा तपास लवकरच पूर्ण करून शुभम शर्माला न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिस