शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

प्रेमासाठी काय पण! 3 मुलांची आई पडली प्रेमात, प्रियकरासह पळून गेली, दुसरं लग्न केलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 6:11 PM

घटस्फोट न देता पत्नीने 1.50 लाख रुपये रोख आणि दागिने घेऊन घरातून पळ काढला आहे. तिने दुसरे लग्नही केल्याचंही म्हटलं आहे.

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से देखील नेहमीच ऐकायला मिळतात. झारखंडमध्ये अशीच हटके गोष्ट पाहायला मिळाली आहे. गढवा जिल्ह्यात तीन मुलांची आई प्रेमात पडून प्रियकरासह पळून गेल्याची घटना समोर आली आहे. यानंतर तिने दुसरं लग्न देखील केले. महिलेच्या पतीने तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गढवा जिल्ह्यातील केतार पोलीस स्टेशन क्षेत्रातील बिजदीह गावातील रहिवासी कन्हैया साह याने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद केसरी यांच्याकडे तक्रार केली आहे. यामध्ये त्याने आपल्याला तीन मुलं असल्याचं म्हटलं आहे. घटस्फोट न देता पत्नीने 1.50 लाख रुपये रोख आणि दागिने घेऊन घरातून पळ काढला आहे. तिने दुसरे लग्नही केल्याचंही म्हटलं आहे.

पोलीस अधिकार्‍यांना दिलेल्या तक्रारीत कन्हैया साहने 13 वर्षांपूर्वी लग्न केलं आहे. यातून त्यांना तीन मुले आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्याच्या पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. नकार दिल्याने पत्नीने सासरच्यांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. हे प्रकरण अजूनही न्यायालयात सुरू होते. 

21 डिसेंबर रोजी तीन मुलांना सोडून पत्नीने दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून जाऊन लग्न केले. आईने घर सोडल्यानंतर तिन्ही मुले सध्या वडिलांकडे आहेत. यासंदर्भात चाइल्डलाइनचे समन्वयक रोबोट कछाप यांनी सांगितले की, तरतुदीनुसार या मुलांना शक्य ती सर्व मदत केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी