धक्कादायक! लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास करत होती टाळाटाळ, नाराज पतीने उचललं 'हे' पाउल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 06:15 PM2021-07-19T18:15:13+5:302021-07-19T18:17:29+5:30

आरोपीनुसार, त्याची पत्नी लग्नाला चार दिवस होऊनही गेल्यावरही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. ज्यामुळे तो नाराज झाला होता आणि याच रागात त्याने पत्नीची हत्या केली.

Madhya Pradesh : Bride was refusing to have physical relationship after marriage angry husband killed her in Ratlam/ | धक्कादायक! लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास करत होती टाळाटाळ, नाराज पतीने उचललं 'हे' पाउल!

धक्कादायक! लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास करत होती टाळाटाळ, नाराज पतीने उचललं 'हे' पाउल!

googlenewsNext

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) रतलाममधून (Ratlam) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका नवविवाहित तरूणाने लग्नाच्या पाच दिवसांनंतरच धक्कादायक पाउल उचललं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लग्न होऊनही पत्नी म्हणजे नवी नवरी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवलं नसल्याने परेशान होता. 

आरोपीनुसार, त्याची पत्नी लग्नाला चार दिवस होऊनही गेल्यावरही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. ज्यामुळे तो नाराज झाला होता आणि याच रागात त्याने पत्नीची हत्या (Husband killed newly wed wife) केली.

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, अंजली सेंधवाचं लग्न शिवगढच्या दिलीप सोनोवासोबत १५ जून रोजी झालं होतं. लग्नाच्या पाच दिवसांनंतर दिलीप पत्नीला घेऊन जिल्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. तिथे त्याने सांगितलं की, ती बाथरूममध्ये पडली.
डॉक्टरांनी अंजलीला बघताच मृत घोषित केलं होतं. दरम्यान हे प्रकरण पोलिसात पोहोचलं आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. १० जुलैला रिपोर्ट आला आणि त्यातून समोर आलं की, अंजलीचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला. (हे पण वाचा : लग्नाच्या एक दिवसआधी रेप केसमध्ये अडकला तरूण, साखरपुडा दुसरीसोबत अन् लग्न दुसरीशी करत होता...)

त्यानंतर पोलिसांनी दिलीपची कसून चौकशी केली. पुन्हा पुन्हा चौकशी केली. यादरम्यान दिलीपने सांगितलं की, त्यानेच त्याच्या नव्या नवरीची हत्या केली. दिलीपने सांगितलं की, त्याने पत्नीचं नाक, तोंड आणि गळा दाबून तिची हत्या केली. ज्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पोलिसही झाले हैराण 

आरोपीने पोलिसांना हत्येची जी कारणे सांगितली ती ऐकून पोलिसही हैराण झाले. आरोपीने पोलिसांना सांगितलं की, लग्नाला चार दिवस उलटून गेलेले असतानाही पत्नी त्याला जवळ येऊ देत नव्हती आणि शारीरिक संबंध ठेवण्यासही मनाई करत होती. आरोपीने सांगितलं की, जेव्हाही तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा ती नकार देत होती. याचाच राग त्याच्या मनात होता आणि त्यातूनच त्याने तिची हत्या केली.
 

Web Title: Madhya Pradesh : Bride was refusing to have physical relationship after marriage angry husband killed her in Ratlam/

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.