शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

तरुण प्रेमात पडला, पण मुलीकडून प्रतिसाद नाही; लग्न करण्यासाठी प्रेमवीरानं केलं विचित्र कृत्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 2:56 PM

तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरु केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.

Bihar Crime ( Marathi News ) : एकतर्फी प्रेमातून अनेकदा तरुणांकडून चुकीचं पाऊल उचलण्याच्या घटना घडतात. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमधील मुंगेर इथं घडली आहे. एकतर्फी प्रेमानंतर तरुणीशी लग्न करण्यासाठी माथेफिरू तरुणाने थेट तरुणीच्या भावाचं अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रं फिरवत आरोपी तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लडैयाटांड या गावातील तरुणाला गावातीलच एक तरुणी आवडत होती. मात्र तरुणीकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र तरीही सदर तरुणाला तिच्याशीच लग्न करायचं होतं. त्यामुळे त्याने चक्क तरुणीच्या भावाचं अपहरण केलं. आरोपी तरुणाला त्याच्या तब्बल आठ मित्रांनी अपहरणासाठी मदत केली होती. धनबाद येथून ट्रेनने घरी परत असताना हे अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर तुझ्या बहिणीला इथं बोलावलं तरंच मी तुला सोडेन, अशी धमकी आरोपीने दिली.

बहिणीला इकडे आणलं नाही तर हा तरुण माझी हत्या करेन, असं सदर तरुणीच्या भावाने फोनवरून कुटुंबीयांना सांगितलं. 

दरम्यान, मुलाचं अपहरण झाल्याचं कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलीस आणि रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरु केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपी आणि त्याच्या साथीदारांना अटक होताच सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट