शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तिसऱ्यांदा लग्न करणार होता, संतापलेल्या दोन बायका पोहोचल्या एसपी कार्यालयात, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 10:21 IST

याप्रकरणी दोन्ही पत्नींनी मुलांसह पोलिस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार दाखल केली आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक व्यक्ती तिसऱ्यांदा लग्न करणार होता. यासाठी त्याने आपल्या पहिल्या दोन पत्नींना मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी दोन्ही पत्नींनी मुलांसह पोलिस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण चिल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने दोनदा लग्न केल्याचा आरोप आहे. २०१८ मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न झाल्याचा आरोप दोन महिलांनी केला आहे. यानंतर पतीने त्यांचा मानसिक छळ सुरू केला आणि त्यांना घराबाहेर हाकलून दिले. यानंतर तो तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते.

हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. आरोपी व्यक्तीने आपल्या पहिल्या लग्नाची माहिती लपवून २०२२ मध्ये बिहारमध्ये दुसरे लग्न केले. यानंतर सुमारे दीड वर्षानंतर आरोपीने त्याच्या दुसऱ्या पत्नीलाही मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीला तिच्या घरात आसरा दिला. आता दोघीही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

पती मुझफ्फरनगरमध्ये तिसरे लग्न करणार असल्याचे दोन्ही पत्नींना समजल्यानंतर त्यांनी तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर दोन्ही पत्नींनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची याचना केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्टेशन प्रभारींना दिले आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले पोलीस अधीक्षक?दरम्यान, पोलीस अधीक्षक अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, चिल्ला पोलिस स्टेशन परिसरातील दोन महिलांनी चिल्ला पोलिस ठाण्यात आरोपी दीपकने फसवणूक केली असून दोनदा लग्न केल्याचे तक्रार पत्र दिले. आरोपीने दोन्ही पत्नींना ओलीस ठेवले आणि मारहाण करून शारीरिक अत्याचार केले. याप्रकरणी चिल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी