शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
3
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
4
Stock Market Updates: मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
5
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
6
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
7
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
8
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
9
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
10
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
11
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
12
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
13
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
14
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
15
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
16
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
17
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
18
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
19
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
20
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

अरे देवा! लग्नात गरमागरम पुरी न मिळाल्याने तुफान राडा; दगडफेकीत 4 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 4:32 PM

लग्न समारंभात गरमागरम पुरी न मिळाल्याने मोठा गोंधळ झाला. वाद इतका वाढला की दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली.

झारखंडमधील गिरिडीहमध्ये एका लग्न समारंभात गरमागरम पुरी न मिळाल्याने मोठा गोंधळ झाला. वाद इतका वाढला की दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गिरिडीहच्या मुफस्सिल पोलीस स्टेशन हद्दीतील पतरोडीह सेंट्रलपीठ येथे रात्री काही तरुणांनी लग्न समारंभात गोंधळ घातला. यावेळी दगडफेकीसह धारदार शस्त्रांचाही वापर करण्यात आला. यामध्ये चार तरुण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी पाहणी केली.

एसडीपीओ अनिल कुमार सिंह, मुफस्सिल पोलीस स्टेशनचे प्रभारी कमलेश पासवान, नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी आरएन चौधरी, पोलीस निरीक्षक विनय कुमार राम हे देखील पोलीस दलासह घटनास्थळी पोहोचले आणि संतप्त लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले.

लग्नसमारंभात जेवण न दिल्याने मुद्दाम गोंधळ झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणाने लग्नात वाद निर्माण केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, पतरोडीह येथील शंकर नावाच्या व्यक्तीच्या घरी वरात आली होती.

रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक तरुण जेवणासाठी पोहोचला आणि गरम पुरीची मागणी करू लागला. यानंतर मोठा वाद झाला. तरुणाने बाहेरून काही साथीदारांना बोलावून गोंधळ घातला. तसेच शिवीगाळ करून दगडफेक केली. याप्रकरणी पोलीस कारवाई करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्न