शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
2
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
3
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
4
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
5
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
6
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
7
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
8
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
9
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
10
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
11
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
12
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
13
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
14
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
15
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
16
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
17
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
18
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
19
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
20
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते

गो-तस्करीच्या आरोपावरून मध्य प्रदेशात जमावाचा हल्ला; महाराष्ट्रातील एक जण मृत्युमुखी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2022 7:03 AM

नर्मदापुरमचे पोलीस अधीक्षक गुरकरन सिंह यांनी सांगितले की, मंगळवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास सिवनी मालवा शहराजवळ बाराखड गावात गायींना घेऊन जाणारा एक ट्रक रोखण्यात आला होता.

नर्मदापुरम (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम जिल्ह्यात गो-तस्करीच्या आरोपावरून एका जमावाने केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले, अशी माहिती  पोलिसांनी दिली.

नर्मदापुरमचे पोलीस अधीक्षक गुरकरन सिंह यांनी सांगितले की, मंगळवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास सिवनी मालवा शहराजवळ बाराखड गावात गायींना घेऊन जाणारा एक ट्रक रोखण्यात आला होता. त्यातून तीन जण गायींची बेकायदा वाहतूक करीत होते. १०-१२ लोकांच्या जमावाने ट्रक रोखून तीन जणांना बेदम मारहाण केली. त्यात तिघे जखमी झाले. पोलिसांनी तिघांना रुग्णालयात नेले. तेथे एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना  अटक करण्यात येईल, असे ते म्हणाले. गायींची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो जखमी झालेला आहे. नजीर अहमद असे मृताचे नाव असून, शेख लाला व मुश्ताक अशी जखमींची नावे आहेत. (वृत्तसंस्था) 

चालकाचा दावा... शेख लाला हा ट्रक चालवत होता. त्याने सांगितले की, नर्मदापुरम जिल्ह्यातील नांदेरवाडा गावातून गायी अमरवतीमध्ये नेत असताना गावकऱ्यांनी वाहन रोखले. गायी कत्तलीसाठी नेल्या जात असल्याचा त्याने इन्कार केला व गायी बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले. त्याच्या ट्रकमध्ये ३० गायी आहेत, असेही त्याने सांगितले.